शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Uddhav vs BJP: "बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 20:30 IST

"पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नापास झाले"

Uddhav Thackeray vs BJP: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे हे रडणारे नेते आहेत. ते आता रडोबा झाले आहेत. खरे तर उद्धव ठाकरे स्वत: रणांगणातून पळून गेले होते, असा खोचक टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष गेला तरी ते सुधरत नाहीत, असा टोमणाही त्यांनी मारला. सोलापूर येथे प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, "नैतिकता हा शब्द उद्धव ठाकरेच्या तोंडून चांगला वाटत नाही. त्यांनी २०१९ मध्येच नैतिकता सोडली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, हे त्यांनी मान्य केलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा जवळ केली. त्यामुळे सर्वात आधी नैतिकता ही त्यांनी सोडली."

"पक्ष प्रमुख म्हणून ते नापास झाले. ते महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकले नाही, पक्षाला नेतृत्व देऊ शकले नाही. ते आता ते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे म्हणत आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, त्याचवेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे संवैधनिक सरकार तयार झाले. उद्धव ठाकरे वारंवार असंवैधानिक सरकार असल्याची ओरड करीत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्हाला कोर्टात जावे लागेल", असा इशारा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला.

"स्वतः शरद पवार यांना असं वाटत आहे की माझा निर्णय चुकला. महाविकास आघाडीचा नेता निवडण्यात चूक झाली. उद्धव ठाकरेंच्या रक्तांमध्ये विकासाचे व्हिजन नाही," याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विकास कामांवर मतदान मिळेल!

"प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० हजार व्यक्तींना भाजपाशी जोडण्याची रचना केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. जेथे आमचे आमदार नाहीत, तेथे आमचा आमदार निवडून येण्याच्या दृष्टीने आमचे पुढील काळात प्रयत्न राहणार असून, त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघांचा प्रवास आपण करणार आहोत. आम्हाला आम्ही केलेल्या विकास कामांवर मतदान मिळेल. कोणावर टीका करून मते मिळवायची गरज भासणार नाही", असा दावाही बावनकुळे यांनी केला.

डबल इंजिन प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारे!

मंत्रीमंडळ विस्तार करणे हा पूर्णतः एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार, डबल इंजिनचे सरकार राज्याला निश्चितपणे प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना