शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

बाळासाहेबांनी काँग्रेसचा तिरस्कार केला नाही; संजय राऊत यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:08 IST

बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह शरद पवार यांच्याशीही बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असे राऊत म्हणाले.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत त्यांनी देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमीच पाठिंबा दिला होता, असा दावा खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह शरद पवार यांच्याशीही बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेस नेत्यांना पाठिंबा दिला होता; पण काहींनी टेंभी नाक्याच्या बाहेरचे जग पाहिले नसल्याने त्यांना त्याबद्दल माहिती नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डाव

नवी मुंबई : देशात ठरावीक उद्योजकांना पायघड्या घातल्या जात आहेत. मुंबई अदानीला, तर नवी मुंबई अंबानीला दिली जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे, केंद्रशासित प्रदेश करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप खा. संजय राऊत यांनी कोपरखैरणे येथे ऐरोली मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार एम. के. मढवी यांच्या प्रचारसभेत केला. 

ही निवडणूक फक्त एका उमेदवाराची नाही तर राज्याची अस्मिता वाचविण्याची आहे. ऐरोलीतील आमदाराने वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली. आमदार म्हणून कोणता प्रकल्प आणला ते सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना