शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बालाजीच्या भक्तांची हवाई सेवेला पसंती

By admin | Updated: July 13, 2016 15:28 IST

औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 13 - औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेली काही वर्षे तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे आणि खाजगी वाहनांचाच पर्याय भक्तांसमोर होता. मात्र,वर्षभरापूर्वी औरंगाबादेतून विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे आजघडीला बालाजी भक्तांकडून हवाई सेवेला चांगली पसंती मिळत आहे.औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी तसेच ही दोन्ही धार्मिकस्थळे जोडण्याच्या उद्देशाने दक्षिणेतील ट्रु जेट कंपनीतर्फे २६ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. ७२ आसनी असलेल्या या कंपनीच्या विमानसेवेने तिरुपतीला जाण्यास बालाजी भक्तांचा ओढा अधिक आहे. हैदराबाद-तिरुपतीला जाण्यासाठी महिन्याला दीड हजारांवर प्रवासी या विमानसेवेला लाभ घेत आहे. यापूर्वी औरंगाबादेतून स्पाईस जेटने औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली होती. परंतु स्पाईस जेटने ही सेवा बंद केली आणि औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरु केली. त्यामुळे बालाजी भक्तांना रेल्वे आणि खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही.

स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाईस जेटचे विमान अखेरचे ठरले. ही विमानसेवा बंद झाल्याने शहराच्या असलेल्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट झाली. परंतु अवघ्या काही दिवसाच ट्रु जेट कंपनीने औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे औरंगाबादकर आणि विशेषत: बालाजी भक्तांना मोठा दिलासा मिळाला.भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही विमानसेवा कायम राहिली पाहिजे, असे टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग म्हणाले. या विमान कंपनीची वर्षभराची सेवा म्हणजे यशाचे उदाहरण असल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे चालविण्यास प्राधान्य असल्याचे ट्रुजेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश म्हणाले.