शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बालाजीच्या भक्तांची हवाई सेवेला पसंती

By admin | Updated: July 13, 2016 15:28 IST

औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 13 - औरंगाबादेतून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेली काही वर्षे तिरुपतीला जाण्यासाठी रेल्वे आणि खाजगी वाहनांचाच पर्याय भक्तांसमोर होता. मात्र,वर्षभरापूर्वी औरंगाबादेतून विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे आजघडीला बालाजी भक्तांकडून हवाई सेवेला चांगली पसंती मिळत आहे.औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या बालाजी भक्तांना आणि हैदराबादहून शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुविधेसाठी तसेच ही दोन्ही धार्मिकस्थळे जोडण्याच्या उद्देशाने दक्षिणेतील ट्रु जेट कंपनीतर्फे २६ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. ७२ आसनी असलेल्या या कंपनीच्या विमानसेवेने तिरुपतीला जाण्यास बालाजी भक्तांचा ओढा अधिक आहे. हैदराबाद-तिरुपतीला जाण्यासाठी महिन्याला दीड हजारांवर प्रवासी या विमानसेवेला लाभ घेत आहे. यापूर्वी औरंगाबादेतून स्पाईस जेटने औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली होती. परंतु स्पाईस जेटने ही सेवा बंद केली आणि औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरु केली. त्यामुळे बालाजी भक्तांना रेल्वे आणि खाजगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही.

स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. ३१ जानेवारी २०१५ रोजी शहरातील १८५ प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे रवाना झालेले स्पाईस जेटचे विमान अखेरचे ठरले. ही विमानसेवा बंद झाल्याने शहराच्या असलेल्या हवाई कनेक्टिव्हिटीत घट झाली. परंतु अवघ्या काही दिवसाच ट्रु जेट कंपनीने औरंगाबादेतून विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला.त्यामुळे औरंगाबादकर आणि विशेषत: बालाजी भक्तांना मोठा दिलासा मिळाला.भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही विमानसेवा कायम राहिली पाहिजे, असे टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग म्हणाले. या विमान कंपनीची वर्षभराची सेवा म्हणजे यशाचे उदाहरण असल्याचे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे चालविण्यास प्राधान्य असल्याचे ट्रुजेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश म्हणाले.