शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ASI संरक्षित स्मारक अन् वक्फ मालमत्ता; औरंगजेबाची कबर हटवणे सोपे नाही, काय करावे लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:52 IST

Aurangzeb Tomb: औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सरकारसमोर कोणते पर्याय आहेत? पाहा...

Aurangzeb Tomb: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी महाराष्ट्रात सातत्याने होत आहे. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर(पुर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलदाबाद भागात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची इच्छा व्यक्त केली असतानाच, महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरी स्टाईल कारसेवेचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत औरंगजेबच्या कबरीबाहेर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

या सगळ्यात प्रश्न असा आहे की, औरंगजेबाची कबर हटवणे इतके सोपे आहे का? तर 'नाही'. कारण, ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला कबर हटवण्यासाठी अनेक कायदेशीर अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

1958 मध्ये राष्ट्रीय स्मारक घोषित एबीपी न्यूजने उपलब्ध कागदपत्रांच्या हवाल्याने सांगितले की, 11 डिसेंबर 1951 रोजी तत्कालीन भारत सरकारने खुलदाबाद येथे असलेल्या औरंगजेबची कबर प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे अधिनियम 1951 नुसार राष्ट्रीय स्मारक घोषित केले. 

कायदा काय सांगतो?प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम (AMASR) च्या कलम 19 नुसार, कोणतेही संरक्षित स्मारक तोडणे, काढणे किंवा नुकसान करणे बेकायदेशीर आहे. जर कोणी तसे केले, तर त्याच्यावर कलम 30 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

भारत सरकारला संरक्षित इमारती हटवण्याचा अधिकार, पण..जोपर्यंत कबर ASI द्वारे संरक्षित आहे, तोपर्यंत महाराष्ट्र सरकार कायदेशीररित्या औरंगजेबाची कबर हटवू शकत नाही. परंतु प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा (AMASR) अंतर्गत ज्या औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळते, त्याच कायद्याच्या कलम 35 मध्ये अशी तरतूद आहे की, सरकारला तिचे महत्त्व काढून टाकण्याचा अधिकार आहे. 

संरक्षित यादीतून काढून टाकावी लागेलASI च्या नियमांनुसार, संरक्षित केलेले कोणतेही स्मारक संवर्धन यादीतून काढून टाकण्यासाठी राज्य सरकार, स्मारकाच्या संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या ASI च्या मंडळाला किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थांनी ASI किंवा AMASR कायद्याच्या कलम 35 नुसार सरकारला कारणांसह प्रस्ताव द्यावा लागेल की, संबंधित स्मारक ASI च्या संवर्धन यादीतून काढून टाकले जावे.

औरंगजेबाच्या कंबरीच्या बाबतीत, महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कबर संरक्षित यादीतून वगळण्यासाठी ASI किंवा सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एकतर केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय कलम 35 अन्वये राजपत्र अधिसूचना जारी करून संरक्षित स्मारकांच्या यादीतून औरंगजेबाची कबर काढून टाकू शकते किंवा पुरातत्व, इतिहास आणि इतर बाबींच्या तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांच्या अहवालाच्या आधारे निर्णय घेऊ शकते.

वक्फ मालमत्ताऔरंगजेबाची कबर 1951 पासून प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम (AMASR) अंतर्गत संरक्षित स्मारक असून, ती महाराष्ट्र वक्फ बोर्डाची मालमत्तादेखील आहे. अशा परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीवर दुहेरी मालकी आहे. औरंगजेबाची कबर ASI ने संरक्षित यादीतून काढून टाकली, तर त्याचे संपूर्ण नियंत्रण वक्फ बोर्डाकडे येईल आणि वक्फ कायद्याच्या कलम 51A आणि 104 A नुसार महाराष्ट्र सरकार औरंगजेबाची कबर नष्ट करू शकत नाही.

ही वक्फ मालमत्ता नाही, हे सिद्ध करावे लागेलअशा परिस्थितीत औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी मकबऱ्याच्या जमिनीची मालकी महाराष्ट्र सरकारकडे असायला हवी आणि त्यासाठी दोन मार्ग आहेत. एकतर वक्फ कायद्याच्या कलम 51 अन्वये महाराष्ट्र सरकारला वक्फ बोर्डाच्या दोनतृतीयांश सदस्यांच्या मान्यतेने औरंगजेबाची कबर ताब्यात घ्यावी लागेल, अन्यथा ती वक्फ बोर्डाची मालमत्ता नाही, असे सिद्ध करावे लागेल. म्हणजेच, औरंगजेबाची कबर कायदेशीररीत्या हटवण्यात किंवा नष्ट करण्यात महाराष्ट्र सरकारसमोर अनेक कायदेशीर अडथळे आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChhaava Movie'छावा' चित्रपटChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीम