शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वाझेंवरून वातावरण तापले, राजकीय खलबतांना वेग; शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 06:57 IST

भाजपच्या आरोपांना चोख उत्तर द्या, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आदेश; देशमुखांच्या राजीनाम्याची शक्यता राष्ट्रवादीने फेटाळली

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, सोमवारी महाविकास आघाडीतील घडामोडींनाही वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी सायंकाळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेत भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर द्या, उगाच बॅकफूटवर जाण्याची गरज नाही, असा आदेश दिल्याचे समजते.  (The atmosphere heats up over sachin vaze , the political turmoil accelerates; Sharad Pawar's discussion with the Chief Minister)

शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्फोटके व त्यानंतरच्या घटनाक्रमात कितीही मोठे अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या वावड्या- सचिन वाझेंबाबत होत असलेले आरोप, शिवसेनेचे एक मंत्रिपद रिक्त असणे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाची अटकळ लावली जात होती. - अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हटविण्यात येणार असल्याच्या वावड्याही उठल्या. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी वाझे प्रकरणावरून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती फेटाळली.

बडे अधिकारी गोत्यात?राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात वेळोवेळी योग्य भूमिका मांडली. त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील म्हणाले. त्याचवेळी जे कुणी अधिकारी चौकशीत दोषी आढळतील त्यांना प्रायश्चित्त घ्यावे लागेल, असे सांगत त्यांनी काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांबाबत कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत दिले. सचिन वाझे प्रकरणात मंत्र्यांचा बळी कशासाठी द्यायचा, असा मतप्रवाह राष्ट्रवादीमध्ये आहे. 

मुख्यमंत्र्यांना भेटले पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात सध्या चर्चा नाही. सोनिया गांधी, शरद पवार आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील,  ते तुम्हाला लवकरच कळतील, असे ते म्हणाले.  

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाShiv Senaशिवसेना