शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला तडे; नाना पटोले पुलावर पोहोचले, सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 17:40 IST

Atal Setu Cracks News: अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. पुलाच्या रस्त्याच्या भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विक्रमी वेळेत पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. आता याला पाच महिने होत नाही तोच पहिल्याच पावसाने रस्ते भेगाळू लागले आहेत. भेगाळल्या भुई परी अटल सेतूपर्यंत जीव मुठीत घेऊन लोकांना जावे लागणार आहे. 

अटल सेतूच्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. भरावासाठी घातलेली माती खचायला लागली असून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात असून मुंबईच्य ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोडला लागलेल्या गळतीनंतरची ही दुसरी महत्वाकांक्षी प्रकल्पाची पोलखोल झाली आहे. 

यामुळे अटल सेतूच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या भेगाळलेल्या अटल सेतूच्या रस्त्याची पाहणी केली आहे. हा मुद्दा विधानसभा निवडणूक आणि पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना विरोधी पक्ष हातात घेण्याची शक्यता आहे.

‘अटल सेतू’ शनिवार दि. १३ जानेवारीपासून सकाळी ८ वाजेपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सुरुवातीला छोट्या वाहनांसाठी ५०० रुपये टोल जाहीर झाला होता, तो नंतर कमी करून २५० रुपये करण्यात आला. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या टोलदरानुसार येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना २५० रुपयांपासून १५८० रुपये एकेरी प्रवासासाठी मोजावे लागत आहेत. या महागड्या टोलमुळे सरकारवर टीकाही झाली होती. सेतू विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगडला जोडला गेला आहे. यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा त्रास कमी झाला आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईroad transportरस्ते वाहतूकNana Patoleनाना पटोले