शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

By यदू जोशी | Published: August 17, 2018 5:34 AM

मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते.

मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते. प्रमोद महाजन यांच्या युतीच्या कल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन अलौकिक राजकीय नेत्यांचा कायमचा स्नेहबंध जुळून आला.१९८९मध्ये झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले जात असले तरी वाजपेयी यांच्याविषयी बाळासाहेबांना असलेल्या आपुलकीच्या भावनेतूनच युती साकारली गेली. २००३मध्ये भाजपामध्ये अटलबिहारी की अडवाणी, असा नेतृत्वाचा वाद उभा करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हा एनडीएचे निर्विवाद नेते व पंतप्रधान म्हणून वाजपेयी हेच राहतील, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून आज केंद्र व राज्यातील भाजपा नेते व सरकारवर सडकून टीका होते. वाजपेयी सरकार असतानादेखील शिवसेनाप्रमुखांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले; पण वाजपेयींवर वैयक्तिक टीका केली नाही. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर वाजपेयी हे बाळासाहेबांशी चर्चा करीत असत. सूत्र सांगतात की, वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले, अटलजी आपण काळजी करू नका. मंत्रिमंडळ स्थापन करताना आपण शिवसेनेचा कोटा किती असावा याचे काही दडपण वगैरे ठेवू नका. आपले नेतृत्व ही देशाची गरज आहे. आपण पंतप्रधान होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात, वाजपेयींनी त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला सन्मानाने सामावून घेतले. एवढेच नव्हेतर, मनोहर जोशी यांना पुढे लोकसभेचे अध्यक्षपद दिले. भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये संघर्षाचे काही प्रसंग १९९५ ते ९९ दरम्यान आले तेव्हा बाळासाहेबांप्रमाणेच अटलबिहारींचा शब्द अंतिम असायचा. दोघांना एकमेकांप्रति कमालीचा आदर होता. युती टिकलीच पाहिजे या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य होते आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी असायची.मुंबईच्या साक्षीने अध्यक्षभारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली अन् या नव्या पक्षाच्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात वाजपेयी अध्यक्ष झाले. त्यांच्या अमोघ वाणीने आणि प्रभावशाली नेतृत्वाने भारावून गेलेले हजारो कार्यकर्ते राज्यात तेव्हाही होते. हजारो किलोमीटरचा प्रवास कधी बसने, कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर तर कधी रेल्वेने करीत चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजपेयी यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे