शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election Result 2021: बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 13:38 IST

Assembly Election Result 2021: महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देभाजपच्या मिशन महाराष्ट्रासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चापश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पदरात मोठी निराशाभाजप नेत्यांचा दावा फोल ठरण्याची शक्यता

मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सर्वांच्या नजरा मात्र पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, तृणमूल काँग्रेसचा विजय जवळपास आता निश्चित मानला जात आहे. यातच आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्तांतराबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत असून, बंगालमधील झटक्यामुळे आता भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. (assembly election result 2021 after loss in west bengal will bjp mission maharashtra fail)

आता केवळ २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालमधील निकाल समोर आल्यानंतर, महाराष्ट्रातही सत्तांतर होऊ शकते, अशी शक्यता काही भाजप नेत्यांनी वर्तवली होती. मात्र, बंगाल निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठं अपयश येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजपचे मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, २ मेपर्यंत थांबा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता.

फडणवीस यांचेही संकेत

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

शरद पवार आणि अमित शहांची भेट

मार्च महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. ही गुप्त भेट असली, तरी त्यासंदर्भातील माहिती समोर आली.  या भेटीनंतर बंगालच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा दावा केला जात होता. यावर, ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशी मोघम पण सूचक प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली होती. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, निवडणुकांचे जवळपास सर्व कल हाती आल्यावर भाजपच्या पदरात मोठी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे. बंगालमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्याचा भाजपचा प्लॅन होता. मात्र, बंगालमध्ये पतन झाल्याने भाजपचं मिशन महाराष्ट्र बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. राजकीय वर्तुळातील तज्ज्ञ मात्र सत्तांतराचा दावा फेटाळत असून, कोरोनाची परिस्थिती ही त्यामागील मेख असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाPoliticsराजकारण