शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

एसीबीमार्फत भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा

By admin | Updated: July 22, 2016 04:13 IST

राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली

मुंबई : राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. विरोधकांनी पुराव्यानिशी मंत्र्यांवर आरोप केले आहेत. गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे या सर्व मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंडप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जो नियम लावला, तो अन्य भ्रष्ट मंत्र्यांना का लावला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. विविध विभागातील घोटाळ्यांच्या मुद्यावर विरोधकांनी नियम २६० अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला सुरुवात करताना मुंडे म्हणाले की, न खाऊंगा, न खाने दुँगा असे म्हणत सत्तेवर आलेल्यांच्या घोटाळ्यांवर प्रत्येक अधिवेशनात बोलावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. चिक्की घोटाळ्यात वर्षभरापूर्वी पुरावे दिले, सातत्याने पत्रव्यवहार करुनही चौकशी करणे तर दूरच, पत्राची साधी पोच देण्याचे सौजन्यही सरकारने दाखवले नाही. कारवाई न करता क्लिनचिट दिली जात असेल तर, समिती तरी कशाला नेमली ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘नमामी चंद्रभागा’ या योजनेसारखी मंत्रिमंडळाला शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन शुद्धीकरणाची मोहिम हाती घ्यावी, असा चिमटाही मुंडे यांनी काढला. केंद्र सरकारने फटकारले, तरी शालेय शिक्षण विभागातील खरेदीची चौकशी करण्यात आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागातील २९७ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे कोणता थांगपत्ताच नाही. तर डाळ घोटाळ्याचे कवित्व यावषीही सुरु असून बाजारात ९० रुपये किलोने मिळत असलेली डाळ रेशन दुकानावर १२० रुपये किलोने विकण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, असा सवाल मुंडे यांनी केला. आदिवासी विभागात दर अधिवेशनाला नवीन घोटाळा समोर येत आहे, असे मुंडे म्हणाले.>भ्रष्ट मंत्री लगे रहो!मुख्यमंत्र्यांनी कालच सभागृहात एकाही मंत्र्यांवर कारवाई करणार नाही, असे वक्तव्य करुन भ्रष्ट मंत्र्यांना लगे रहोचा संदेश दिला आहे. सरकारमध्ये सहभागी असणारे शिवसेनेचे मंत्रीही भ्रष्टाचारात मागे नाहीत. मराठी माणसाचे नाव घेत मराठी माणसाला देशोधडीला लावले आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर हे स्वत: एसआरएचा भ्रष्टाचार आणि आरे येथे बेकायदेशीररित्या जमीन बळकावल्याच्या आरोपात गुंतले आहेत. एसआरए हे आता भ्रष्टाचाराचे दुकान नव्हे तर मॉल बनले आहे. मंत्रीच जर कॉन्ट्रॅक्टर झाले तर जनतेने कुणाकडे पाहावे, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.