शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

एसीबीमार्फत भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा

By admin | Updated: July 22, 2016 04:13 IST

राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली

मुंबई : राज्यातील डझनभर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे. विरोधकांनी पुराव्यानिशी मंत्र्यांवर आरोप केले आहेत. गैरव्यवहारांची कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे या सर्व मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंडप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जो नियम लावला, तो अन्य भ्रष्ट मंत्र्यांना का लावला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. विविध विभागातील घोटाळ्यांच्या मुद्यावर विरोधकांनी नियम २६० अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला सुरुवात करताना मुंडे म्हणाले की, न खाऊंगा, न खाने दुँगा असे म्हणत सत्तेवर आलेल्यांच्या घोटाळ्यांवर प्रत्येक अधिवेशनात बोलावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. चिक्की घोटाळ्यात वर्षभरापूर्वी पुरावे दिले, सातत्याने पत्रव्यवहार करुनही चौकशी करणे तर दूरच, पत्राची साधी पोच देण्याचे सौजन्यही सरकारने दाखवले नाही. कारवाई न करता क्लिनचिट दिली जात असेल तर, समिती तरी कशाला नेमली ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘नमामी चंद्रभागा’ या योजनेसारखी मंत्रिमंडळाला शुद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवीन शुद्धीकरणाची मोहिम हाती घ्यावी, असा चिमटाही मुंडे यांनी काढला. केंद्र सरकारने फटकारले, तरी शालेय शिक्षण विभागातील खरेदीची चौकशी करण्यात आली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागातील २९७ कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे कोणता थांगपत्ताच नाही. तर डाळ घोटाळ्याचे कवित्व यावषीही सुरु असून बाजारात ९० रुपये किलोने मिळत असलेली डाळ रेशन दुकानावर १२० रुपये किलोने विकण्यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत, असा सवाल मुंडे यांनी केला. आदिवासी विभागात दर अधिवेशनाला नवीन घोटाळा समोर येत आहे, असे मुंडे म्हणाले.>भ्रष्ट मंत्री लगे रहो!मुख्यमंत्र्यांनी कालच सभागृहात एकाही मंत्र्यांवर कारवाई करणार नाही, असे वक्तव्य करुन भ्रष्ट मंत्र्यांना लगे रहोचा संदेश दिला आहे. सरकारमध्ये सहभागी असणारे शिवसेनेचे मंत्रीही भ्रष्टाचारात मागे नाहीत. मराठी माणसाचे नाव घेत मराठी माणसाला देशोधडीला लावले आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर हे स्वत: एसआरएचा भ्रष्टाचार आणि आरे येथे बेकायदेशीररित्या जमीन बळकावल्याच्या आरोपात गुंतले आहेत. एसआरए हे आता भ्रष्टाचाराचे दुकान नव्हे तर मॉल बनले आहे. मंत्रीच जर कॉन्ट्रॅक्टर झाले तर जनतेने कुणाकडे पाहावे, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.