शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ही तर 'अनैसर्गिक आघाडी'चा खुलासा करणारी मुलाखत, आशीष शेलारांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:49 IST

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिलीजनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती

मुंबई -  आज सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजपा नेते आशीष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. ही तर अनैसर्गिक आघाडीचा खुलासा करणारी मुलाखत असल्याचा टोला आशीष शेलार यांनी लगावला आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला भाजपा नेते आशीष शेलार यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. ''महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडीचा “खुलासा” करणारी मुलाखत दिली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या विकासाचा रोडमॅप आणि जनतेला “दिलासा” देणारी अपेक्षित होती, अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे. 

दरम्यान, सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासह अनेक बाबींवपर गौप्यस्फोट केले  आहेत. या मुलाखतीमध्ये सध्या  महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं! बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.'' 

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजपावर हल्लाबोल केला आहे. 'आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहणार. त्यात तडजोड नाही' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच 'हिंदुत्वाच्या मुद्दयावर आम्ही एकत्र आलोे. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही' अशा शब्दांत भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना