शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

निवडणुकीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग रेटला जाण्याची चिन्हे, नव्याने आंदोलनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 12:14 IST

सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये ...

सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाचा विषय प्राधान्याने अजेंड्यावर आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नांदेड येथील प्रचारसभेत शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा उचलून धरल्याने राज्य शासनही तो नव्याने मार्गी लावण्याची शक्यता आहे.शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील अर्थकारणाला चालना मिळेल, असा दावा मोदी यांनी जाहीर सभेत केला. स्वत: पंतप्रधानच महामार्गाची पाठराखण करीत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांवर मीठ चोळले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट होण्यात शक्तिपीठचा मुद्दाही महत्त्वाचा ठरल्याची चर्चा होती. त्यामुळे विधानसभेला ताकही फुंकून पिण्याचा प्रयत्न युतीच्या नेत्यांनी केला. महामार्ग रद्द होणारच यावर भर दिला. आता निवडून आल्यानंतर त्यांना दिल्या शब्दाला जागावे लागणार आहे. अधिसूचनेनुसार सांगली, कोल्हापुरातील महामार्ग रद्द झाला, तरी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांत तो होणार असल्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांना त्याविरोधात नव्याने लढा उभारावा लागणार आहे.नव्या आमदारांनी शब्द पाळावाविधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यान कोल्हापुरात आजी-माजी आमदारांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला जाईल, अशी ग्वाही दिली होती. यातील काहीजण निवडूनही आले आहेत. आता त्यांनी महामार्ग रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस अगोदर घाईगडबडीने सांगली, कोल्हापुरातील महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना काढली होती. पण, पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा पुन्हा उचलल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSangliसांगलीhighwayमहामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारFarmerशेतकरी