शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्यांबद्दल का बोलता?; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:42 IST

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीसांनी(Amruta Fadnavis) राज्य शासनावर टीकास्त्र सोडलं.

ठळक मुद्देआपल्याच घरातील कर्त्याला पत्र पाठवलं त्याला तो कर्ता पुरुष दुसऱ्या कुटुंबात काय चाललंय? हे सांगतात.शक्ती कायद्यासाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन आवश्यक आहे मागच्या वर्षी किती होते? तुम्ही टक्केवारी दाखवू नका. २ महिने लक्ष कुठे आहे?

मुंबई – महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांवर अत्याचार होतोय हे दुख:द बाब आहे. गेल्या २ महिन्यापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत त्यावर साम, दाम, दंड भेद कुठल्याही प्रकारे यावर तडा आणता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे आहे? असा सवाल अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) केला आहे.

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीसांनी(Amruta Fadnavis) राज्य शासनावर टीकास्त्र सोडलं. त्या म्हणाल्या की, बलात्कारी विचारांना ठेचायला हवं. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी जे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यात त्यांनी काय म्हटलं तर महिला अत्याचाराबाबत २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा असं सूचवलं. महाराष्ट्र एक कुटुंब आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याने आपल्याच घरातील कर्त्याला पत्र पाठवलं त्याला तो कर्ता पुरुष दुसऱ्या कुटुंबात काय चाललंय? हे सांगतात. तुम्ही दहा कुटुंबाबद्दल का बोलता? शक्ती कायद्यासाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच साकीनाका, डोंबिवली दर ४ दिवसांनी राज्यात महिला अत्याचाराच्या बातम्या पुढे येत आहेत. सुरक्षित मुंबईत अलीकडेच दोन घटना घडल्या. मागच्या वर्षी किती होते? तुम्ही टक्केवारी दाखवू नका. २ महिने लक्ष कुठे आहे? आपल्या माणसांना वसुली मिळतेय यावर लक्ष आहे का? तुम्ही हे प्रकार घडण्यापासून रोखले पाहिजेत अशी मागणीही अमृता फडणवीसांनी केली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना दुसरीकडे काय घडतं हे बघत नव्हते. महिलांवर अत्याचार झाल्यावर त्यांनी केलेल्या कारवाया बघू शकता. मी जे बोलते त्याने फायदा होतो की नुकसान हे पाहत नाही. माझा विचार दृष्टीकोन समोरच्यांकडे पोहचतोय का? त्याला अक्कल येतेय का? हे पाहून बोलते. मला जिथं कळकळीनं बोलावं वाटतं तिथे बोलते. अनेकदा माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नुकसान झालंय परंतु त्यांनी मला कधीही रोखलं नाही. एक स्त्री म्हणून मी माझं मत मांडते. माझी मागणी एखाद्या राजकीय विचारसरणीतून पाहिली जाते. सामान्य स्त्री म्हणून मी एखाद्या विषयावर मतं मांडत आहे. राजकीय खेळीसाठी मी बोलत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात जे दिसतं ते बोलण्याचा माझा हक्क आहे असंही अमृता फडणवीसांनी ठामपणे म्हंटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmruta Fadnavisअमृता फडणवीसMolestationविनयभंगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस