शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 4:22 PM

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पुन्हा महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र असे असलेही तरीही, दीड महिन्यांचा कालवधी उरला असतानाही दोन्ही पक्षातील जागावाटपाचा निर्णय अजूनही होऊ शकला नाही. त्यामुळे मित्र पक्षांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे. जर भाजप- सेना सोबत लढली तर निश्चितच याचा फायदा मित्र पक्षांच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत. मात्र कुणाला किती जागा द्यायच्या या बाबतचा खुलासा अजूनही होऊ शकला नाही. मात्र रासप प्रमुख आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी किमान १४ जागा आपल्याला सोडाव्यात अशी मागणी केली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा १० जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १२ तर आमदार विनायक मेटे यांनी सुद्धा १२ जागा देण्याची मागणी केली आहे.

भाजप-शिवसेनेत एकीकडे युतीची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते आमची स्वबळाची तयारी सुद्धा झाली असल्याचे वक्तव्य करत असल्याने ऐनवेळी युती फिसकटली जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र युती जर फिसकटली तर याचा फटका मित्र पक्षांना सुद्धा बसण्याची शक्यता असल्याने, मित्र पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. जर युती झाली तर निश्चितच याचा फायदा सुद्धा मित्र पक्षाच्या उमेदवारांना होणार आहे. त्यामुळे युती व्हावीच अशी अशा मित्र पक्षांच्या नेत्यांना लागली आहे.