शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अजित पवारांना निर्णय घेण्याचा अधिकार, पण माझी फक्त एकच तक्रार...; पवारांचा खास शैलीत वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 17:05 IST

अजित पवार गटाने काल केलेल्या आरोपांना शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पुणे : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर घेऊन आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. तसंच या शिबिरातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवण्यात आली. या आरोपांना आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवारांनी आता एक राजकीय निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार आहे. पण माझी फक्त एकच तक्रार आहे की, त्यांनी हा निर्णय आता घेण्याऐवजी ज्यावेळी त्यांनी निवडणुकीला फॉर्म भरला, तो फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या नावाचा घेतला, त्यांना जे तिकीट देण्यात आलं ते माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या सहीने आणि मान्यतेने देण्यात आलं आणि त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली. मग आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणं योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करताना शरद पवार म्हणाले की, "ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो आम्हा लोकांना मान्य नव्हता. विधानसभा निवडणुकीत आम्ही जी मते मागितली होती, ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. तेव्हा आम्ही जी भूमिका मांडली, त्याविरोधात जाणं ही लोकांची फसवणूक ठरली असती. आजही आमची भूमिका भाजपविरोधात आहे."

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा पुन्हा मागे घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना स्वत:च आंदोलन करायला सांगितलं, असा घणाघात काल अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. त्यावर पवार यांनी म्हटलं की, "मला राजीनामा द्यायचा किंवा मागे घ्यायचा असेल तर कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. त्याबाबतचा निर्णय घेण्याची माझी कुवत आहे." 

दरम्यान, मी पुस्तक लिहून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. त्यावरही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. "प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मीही वाट बघत आहे. लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं," असा टोला पवारांनी लगावला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे