शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

"एकीकडे प्रेतं जळत होती अन् दुसरीकडे हे लोक पेढे वाटत होते, महाराष्ट्रात असं घडणं म्हणजे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:05 IST

समृद्धी महामार्गावरील अपघाताला २४ तासही झाले नसताना, राज्यात शपथविधी पार पडल्याने राऊतांचा संताप

Sanjay Raut on Ajit Pawar, Maharashtra Political Crisis: अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना राजभवनावर शपथविधीचा सोहळा पार पडला हे अत्यंत निर्दयीपणाचं लक्षण आहे. मृतांच्या यादीत बारामतीमधले तीन लोक होते. विदर्भातील लोकांची प्रेतं पडलेली होती. पण २४ तास या दुर्घटनेला व्हायच्या आधीच एकीकडे प्रेतं जळत असताना, राजभवनात हे लोक पेढे वाटत होते, फटाके वाजवत होते, शपथा घेत होते. महाराष्ट्राने इतकं निर्घृण राजकारण या आधी कधीही पाहिलेलं नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारच्या शपथविधी सोहळ्यावर भाष्य केलं.

"या लोकांना शपथविधीची घाई होती, पण त्यांनी थोडं थांबायला हवं होतं. शपथविधीची इतकी धावपळ का केली. काल राज्याने जे चित्र पाहिलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं चित्र होतं. महाराष्ट्रावर संकट कोसळलं, २५-२६ जणांचा मृत्यू झाला, सामुदायिक अंत्यसंस्कार सुरू होते, त्याच वेळी या लोकांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची घाई लागली होती. हा काय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भाजपा महाराष्ट्राला कलंक लावत आहेत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व आणि नाव पुसण्याचा खेळ सुरू आहे, या लोकशाहीला न परवडणारा खेळ आहे," अशी टीका केली.

अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप हे पक्ष आपापल्या नेत्यांच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात आता नवा मुख्यमंत्री होणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल. एकनाथ शिंदे यांना हटवले जाईल. अपात्रतेच्या केसमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील. यामुळे इतक्या घाईगडबडीत अजित पवारांना सोबत घेतले आहे. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाbuldhanaबुलडाणा