शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:53 PM

अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? असा सवालही विचारण्यात आला.

धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २ महिन्यापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्व ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका घेत शासनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याबाबत वेगवेगळे मतप्रवाह, टिकाटिप्पणी सुरू झाली. सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत, दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. याचा अर्थ असा इंग्रजी आणि हिंदीवर चांगले प्रभुत्व असल्याने आणि शरद पवार नावाचे वलय त्यांच्यासोबत आहे. याचा वापर करून हा पक्ष किमान दिल्लीत तरी वाढायला हवा होता. वर्षातील १८० दिवस खासदार म्हणून तुम्ही दिल्लीतच होता. मग आजपर्यंत दिल्लीत साधा १ नगरसेवक निवडून आणता आला नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.

प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही सांगायचे. राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी मिझारोम, त्रिपुरा इथं त्यांच्या पातळीवर खासदार पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येणार, केरळमध्ये १-२ आमदार येणार. गोव्यात पक्ष संपून गेला. महाराष्ट्रात हेलफाटे मारत बसण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवला असता तर आज पक्ष खूप मोठा झाला असता. माझे पक्षावर प्रेम आहे म्हणून मला वाटते. ज्यांचे व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह आहे, शरद पवार नावाचा पाठिंबा आहे. इतके असूनही देशभरात पक्ष वाढू शकला नाही त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचसोबत गोवा, गुजरात, मिझारोम, नागालँड, बिहार याठिकाणी अजित पवारांनी जाऊन पक्ष वाढवायचा का? अजित पवार एकटे राज्य सांभाळायला सक्षम होते. परंतु अजित पवारांनी कष्ट केल्यानंतर यांना डोके लावायचे होते म्हणून आज ही वेळ आलीय. आम आदमी पक्ष २ राज्यात सत्ता मिळवतो. संपूर्ण महाराष्ट्र आज पक्ष व्यापलेला नाही. देशाचे पंतप्रधानपदासाठी असलेले व्यक्तिमत्व असलेले शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. परंतु देशभरात पक्ष वाढवला नाही. अजित पवारांची कोंडी करायची आणि अडचण करायची आणि विनाकारण आपापले फोलोअर्स वाढवले, अजित पवारांनी महाराष्ट्र बघितला असता तर ही अडचण आली नसती असंही उमेश पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? त्यावर एकही बोलले नाहीत. हे असे चालत नसते. प्रफुल पटेल शरद पवारांची सावली म्हणून काम केले, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका घेतली ज्यांनी ४० वर्ष तुमच्यासोबत काम केले. हे लोकं विरोधात राहिले नव्हते का? आत्ताच हा निर्णय घ्यायची वेळ का आली. कुवत नसलेल्या माणसाच्या हातात पक्षाची सूत्रे द्यायचा प्रयत्न झाला तर पक्ष बुडणार हे निश्चित होते. त्यामुळे पक्ष वाचवण्यासाठी अजित पवारांनी जबाबदारी घेतली असंही उमेश पाटलांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस