शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:18 IST

पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई - Umesh Patil on Anjali Damania ( Marathi News ) पुण्यातील दुर्घटना दुर्दैवी, संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. या प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू आहे. दोषींना मदत करणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीय. ब्लड सँम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांना अटक झालीय. कायद्याच्या प्रक्रियेने योग्य ती कारवाई सुरू आहे. जर यात कुणाचा हस्तक्षेप असता तर कारवाई झालेली दिसली नसती. मग अंजली दमानिया यांचा बोलविता धनी कोण? त्यांचेच कॉल रेकॉर्डिंग आणि नार्को टेस्ट करण्याची गरज आहे असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. 

उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, डोंबिवली कंपनीत स्फोट, उजनीत बोट बुडाली यासारख्या दुर्घटना गेल्या १०-१५ दिवसांत झाल्या. या दुर्घटनेबाबत अंजली दमानिया संवेदनशील असल्याचं दिसल्या नाहीत. दमानिया यांना नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. या दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न शासन यंत्रणा करत असते. परंतु जाणीवपूर्वक पुण्याच्या घटनेवरून राष्ट्रवादीला आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा उद्योग सुपारी घेऊन काही लोकांनी चालवला आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच राज्यात १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याच्या दुर्घटनेनंतर गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत पुण्याच्या प्रकरणावर कारवाईचे आदेश दिले. त्याचवेळी मंत्रालयात दुष्काळाबाबत आणि पाणी टंचाईबाबत अजित पवार अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. मतदान संपल्यानंतर अनेक नेते काश्मीरपासून जगभरात विश्राम घ्यायला गेले असताना मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार मंत्रालयात सकाळी ८ वाजता काम करत होते. ३५ वर्ष महाराष्ट्र अजित पवारांना पाहतोय. लोकांची कामे करतात म्हणून अजितदादा लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतात. तुम्हाला कुणी निवडून दिलंय? आपण ग्रामपंचायतीत तरी निवडून आलात का? एखादी निवडणूक लढवून आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे तपासा असंही उमेश पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, सातत्याने बिनबुडाचे आरोप करणं चुकीचे आहे. दमानियांकडे पुरावे काय?, पालकमंत्री म्हणून आयुक्त, जिल्हाधिकारी यांना फोन करणं, आढावा घेणे त्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्र्यांचे काम असते. अंजली दमानियांना विचारून फोन करायचा का? काम करणारा माणूस सातत्याने काम करत असतो. अंजली दमानिया यांनी राज्यात इतर दुर्घटना घडल्यात, त्यातील मृत्यूबाबतही संवेदनशीलता दाखवायला हवी होती असंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे.   

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाAjit Pawarअजित पवारPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेस