शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:18 IST

पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर टार्गेट करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई - Umesh Patil on Anjali Damania ( Marathi News ) पुण्यातील दुर्घटना दुर्दैवी, संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. या प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू आहे. दोषींना मदत करणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीय. ब्लड सँम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांना अटक झालीय. कायद्याच्या प्रक्रियेने योग्य ती कारवाई सुरू आहे. जर यात कुणाचा हस्तक्षेप असता तर कारवाई झालेली दिसली नसती. मग अंजली दमानिया यांचा बोलविता धनी कोण? त्यांचेच कॉल रेकॉर्डिंग आणि नार्को टेस्ट करण्याची गरज आहे असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. 

उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, डोंबिवली कंपनीत स्फोट, उजनीत बोट बुडाली यासारख्या दुर्घटना गेल्या १०-१५ दिवसांत झाल्या. या दुर्घटनेबाबत अंजली दमानिया संवेदनशील असल्याचं दिसल्या नाहीत. दमानिया यांना नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. या दुर्घटना घडू नये यासाठी प्रयत्न शासन यंत्रणा करत असते. परंतु जाणीवपूर्वक पुण्याच्या घटनेवरून राष्ट्रवादीला आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा उद्योग सुपारी घेऊन काही लोकांनी चालवला आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच राज्यात १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याच्या दुर्घटनेनंतर गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत पुण्याच्या प्रकरणावर कारवाईचे आदेश दिले. त्याचवेळी मंत्रालयात दुष्काळाबाबत आणि पाणी टंचाईबाबत अजित पवार अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. मतदान संपल्यानंतर अनेक नेते काश्मीरपासून जगभरात विश्राम घ्यायला गेले असताना मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार मंत्रालयात सकाळी ८ वाजता काम करत होते. ३५ वर्ष महाराष्ट्र अजित पवारांना पाहतोय. लोकांची कामे करतात म्हणून अजितदादा लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतात. तुम्हाला कुणी निवडून दिलंय? आपण ग्रामपंचायतीत तरी निवडून आलात का? एखादी निवडणूक लढवून आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे तपासा असंही उमेश पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, सातत्याने बिनबुडाचे आरोप करणं चुकीचे आहे. दमानियांकडे पुरावे काय?, पालकमंत्री म्हणून आयुक्त, जिल्हाधिकारी यांना फोन करणं, आढावा घेणे त्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मंत्र्यांचे काम असते. अंजली दमानियांना विचारून फोन करायचा का? काम करणारा माणूस सातत्याने काम करत असतो. अंजली दमानिया यांनी राज्यात इतर दुर्घटना घडल्यात, त्यातील मृत्यूबाबतही संवेदनशीलता दाखवायला हवी होती असंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे.   

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाAjit Pawarअजित पवारPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातNCPराष्ट्रवादी काँग्रेस