शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Aurangabad Violence: पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून अजित पवारांचा CM वर नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 1:47 PM

अजित पवार यांनी औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

मुंबई- औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादावादीनंतर उसळलेल्या दंगलीवरून सरकारवर सर्वस्तरातून टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसंच पोलीस प्रशासनालाही यासाठी तितकंच जबाबदार धरलं आहे. औरंगाबादमधील हिंसा हे सरकारचं पूर्ण अपयश असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.हिंसेच्या वेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी सतर्क राहायला हवं होतं, असं अजित पवार म्हणाले. तसंत औरंगाबादमधील प्रकारासाठी अजित पवार यांनी गृहखातं सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. कडक कारवाई करण्यात मुख्यमंत्री कमी पडत आहेत. दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जावी,अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, औरंगाबादमधील हिंसाचारावरून सामना संपादकीयमधूनही सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. औरंगाबादमधील हिंसाचार म्हणजे राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा असल्याची टीका सामनातून करण्यात आली. किरकोळ कारणावरून दंगल भडकते व त्यातून कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. ही कारणं पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीका केली. शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठ्या  संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाहीअसा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय?'', असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस