शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 3:43 PM

Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा देत, कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादचेच नाव हवे, असे ठणकावून सांगितले आहे. 

इम्तियाज जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यावेळी काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. या बैठकीत एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. जगभरात औरंगाबाद शहराची ऐतिहासिक ओळख आहे. परंतु केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, तसेच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचा आदर करतो, संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा, असे आव्हान जलील यांनी यावेळी बोलताना दिले. औरंगाबादच्या नामांतरावेळी आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला नक्कीच विचारतील की, जेव्हा या शहराचे नामांतर होत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून, मला मृत्यूही औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफीकेटवर औरंगाबाद आहे. तर डेथ सर्टिफीकेटवरही औरंगाबादच असायला हवे, असेही जलील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जाता जात यांनी खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे. त्यांना बहूमत चाचणी सिद्ध करायची होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्याने त्यांनी जाता जाता हे वाईट राजकारण खेळले आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सांगू इच्छितो नावे बदलली तरी इतिहास कुणी बदलू शकत नाही. तुम्ही राजकारणाच्या खालच्या पातळीचे उदाहरण दिले आहे. फक्त नागरिकच ठरवू शकतात की औरंगाबाद शहराचे नाव हे काय असायला हवे. या विरोधात आम्ही आंदोलने करु, असा इशाराही जलील यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे