शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पक्षांतरात नगरी नेते आघाडीवर; आयारामांकडेच जिल्ह्याचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:11 IST

भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता भविष्याचा वेध घेण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेते आघाडीवर दिसत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगरमध्ये सर्वाधिक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यामुळे अहमदनगरला पक्षांतराचा जिल्हा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पक्षांतराचा सर्वाधिक धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. २०१४ पासून चार नेत्यांनी पक्षांतर केले असून दोन नेते भाजपच्या वाटेवर आहेत.

२०१४ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. यापैकी सर्वच्या सर्व नेते भाजपमध्येच गेले आहेत. यावरून नगरच्या नेत्यांची पक्षांतरासाठी केवळ भाजपलाच पसंती असल्याचे दिसून येते. अर्थात भाजप राज्यातील मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील ८ नेत्यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यापैकी अनेक जण निवडूनही आले आहेत.

भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे. पिचड आणि जगताप यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे आणि स्नेहलता कोल्हे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी याच वर्षात भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे खासदार झाले, तर राधाकृष्ण विखे यांना राज्यात मंत्रीपद मिळाले. तर बाळासाहेब मुरकुटे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी होते. ते आता नेवासा मतदार संघातून आमदार आहेत. तर आम आदमी पक्षातून भाजपमध्ये गेलेले नितीन उदमाले श्रीरामपूरमधून भाजपकडून इच्छूक आहेत.

एकूणच नगर जिल्ह्याचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांवरच सुरू आहे. या नेत्यांनी काळाची पावलं ओळखून आपल्या पक्षांना रामराम केला. मात्र नगरी नेत्यांच्या या पक्षांतराचा सर्वाधिक धक्का राष्ट्रवादीलाच बसला आहे.