शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
2
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
3
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
4
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
5
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
6
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
7
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
8
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
9
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
10
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
11
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
12
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
13
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
14
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
15
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
16
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
17
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
18
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
19
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
20
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 

पक्षांतरात नगरी नेते आघाडीवर; आयारामांकडेच जिल्ह्याचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:11 IST

भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता भविष्याचा वेध घेण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेते आघाडीवर दिसत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगरमध्ये सर्वाधिक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यामुळे अहमदनगरला पक्षांतराचा जिल्हा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पक्षांतराचा सर्वाधिक धक्का राष्ट्रवादीला बसला आहे. २०१४ पासून चार नेत्यांनी पक्षांतर केले असून दोन नेते भाजपच्या वाटेवर आहेत.

२०१४ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. यापैकी सर्वच्या सर्व नेते भाजपमध्येच गेले आहेत. यावरून नगरच्या नेत्यांची पक्षांतरासाठी केवळ भाजपलाच पसंती असल्याचे दिसून येते. अर्थात भाजप राज्यातील मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील ८ नेत्यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यापैकी अनेक जण निवडूनही आले आहेत.

भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे. पिचड आणि जगताप यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे आणि स्नेहलता कोल्हे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी याच वर्षात भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे खासदार झाले, तर राधाकृष्ण विखे यांना राज्यात मंत्रीपद मिळाले. तर बाळासाहेब मुरकुटे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी होते. ते आता नेवासा मतदार संघातून आमदार आहेत. तर आम आदमी पक्षातून भाजपमध्ये गेलेले नितीन उदमाले श्रीरामपूरमधून भाजपकडून इच्छूक आहेत.

एकूणच नगर जिल्ह्याचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांवरच सुरू आहे. या नेत्यांनी काळाची पावलं ओळखून आपल्या पक्षांना रामराम केला. मात्र नगरी नेत्यांच्या या पक्षांतराचा सर्वाधिक धक्का राष्ट्रवादीलाच बसला आहे.