शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

weather: गारांनंतर वाढला पारा, चाळिशीपुढे गेलेल्या शहरांची ‘लाहीलाही’, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 07:07 IST

weather: उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गुरुवारसाठी मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्माघाताचे प्रकार वाढत असून सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत चार जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.

विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अशा जिल्ह्यांत २२ एप्रिलपासून वळवाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. खान्देश, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अक्षय तृतीयेनंतरही वळवाच्या वातावरणाचा परिणाम टिकून राहील. मराठवाड्यात गुरुवारी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात अवकाळी वातावरण गुरुवारपासून डोकावणार असून, ५ ते ७ दिवस टिकून राहील.      - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

ही घ्या काळजी n शक्यतो उन्हाच्या आधी महत्त्वाची कामे आटोपाn तीव्र उन्हात बाहेर जाताना रुमाल, छत्री, सनगॉगल वापरा. n पाण्याची बाटली बाळगा. n भरपूर पाणी प्या n कूलर किंवा एसीतून एकदम उन्हात जाणे किंवा उन्हातून एकदम एसी कूलरच्या गारव्यात जाणे टाळा.

कोणते जिल्हे होरपळत आहेत?रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

गारव्यासाठी वाढली विजेची मागणी : मुंबईसह राज्यभरात वाढत्या उकाड्यामुळे पंखा, एसी आणि कूलरचा वापरही वाढला आहे. परिणामी विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मंगळवारी राज्यभरातून सुमारे २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. दुपारपर्यंत मुंबई वगळता राज्यभरातून २३ हजार ७८५ मेगावॅट,  दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंद झाली. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीजवाहिन्यांच्या जाळ्यावरून बुधवारी २ हजार ४२ मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर १ हजार ८४० मेगावॉटचा पुरवठा करण्यात आला.

शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती  वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडिया यांनी दिली.

राज्यभरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येसोलापूर     ४२.२ ठाणे बेलापूर     ४२ मालेगाव     ४२ जळगाव     ४१.९ जालना     ४१.७ परभणी     ४१.५ बीड     ४१.५ धाराशिव     ४०.३ पुणे     ४० सातारा     ३९.९ बारामती     ३९.६ कोल्हापूर     ३९.५ सांगली     ३९.७ अहमदनगर     ३९.७ नाशिक     ३८.८ मुंबई     ३८.८ लोणावळा     ३७माथेरान     ३६.४ 

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र