शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

weather: गारांनंतर वाढला पारा, चाळिशीपुढे गेलेल्या शहरांची ‘लाहीलाही’, कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 07:07 IST

weather: उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गुरुवारसाठी मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्माघाताचे प्रकार वाढत असून सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत चार जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.

विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अशा जिल्ह्यांत २२ एप्रिलपासून वळवाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. खान्देश, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अक्षय तृतीयेनंतरही वळवाच्या वातावरणाचा परिणाम टिकून राहील. मराठवाड्यात गुरुवारी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात अवकाळी वातावरण गुरुवारपासून डोकावणार असून, ५ ते ७ दिवस टिकून राहील.      - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

ही घ्या काळजी n शक्यतो उन्हाच्या आधी महत्त्वाची कामे आटोपाn तीव्र उन्हात बाहेर जाताना रुमाल, छत्री, सनगॉगल वापरा. n पाण्याची बाटली बाळगा. n भरपूर पाणी प्या n कूलर किंवा एसीतून एकदम उन्हात जाणे किंवा उन्हातून एकदम एसी कूलरच्या गारव्यात जाणे टाळा.

कोणते जिल्हे होरपळत आहेत?रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

गारव्यासाठी वाढली विजेची मागणी : मुंबईसह राज्यभरात वाढत्या उकाड्यामुळे पंखा, एसी आणि कूलरचा वापरही वाढला आहे. परिणामी विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मंगळवारी राज्यभरातून सुमारे २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. दुपारपर्यंत मुंबई वगळता राज्यभरातून २३ हजार ७८५ मेगावॅट,  दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंद झाली. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीजवाहिन्यांच्या जाळ्यावरून बुधवारी २ हजार ४२ मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर १ हजार ८४० मेगावॉटचा पुरवठा करण्यात आला.

शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती  वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडिया यांनी दिली.

राज्यभरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येसोलापूर     ४२.२ ठाणे बेलापूर     ४२ मालेगाव     ४२ जळगाव     ४१.९ जालना     ४१.७ परभणी     ४१.५ बीड     ४१.५ धाराशिव     ४०.३ पुणे     ४० सातारा     ३९.९ बारामती     ३९.६ कोल्हापूर     ३९.५ सांगली     ३९.७ अहमदनगर     ३९.७ नाशिक     ३८.८ मुंबई     ३८.८ लोणावळा     ३७माथेरान     ३६.४ 

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र