शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

"...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 12:29 IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं.

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना महाविकास आघाडी सरकारमध्येही नाराजी असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी नोकरशहांवर मंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप केला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा मुद्दा समोर आणणार आहे असं त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून लवकरच मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन चर्चा करतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं. तर, एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अशोक चव्हाण म्हणाले की, अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सरकारमध्ये काही मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे असं सांगत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करुन घ्यावं अशी आग्रही मागणी केली होती. तसेच भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला साथ दिली आहे, याचा अर्थ काँग्रेस कमकुवत आहे असं नाही. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांचे ऐकलं जात नाही. तिन्ही पक्षाचं मिळून हे सरकार बनलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चित काँग्रेसचं जे म्हणणं आणि मुद्दे असतील ते ऐकून त्यावर तोडगा काढतील अशी अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यानंतर, आता खासदार संजय राऊत यांनी सर्वकाही ठिक असल्याचं म्हटलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारच्या सर्वच मंत्र्यांसोबत चांगला समन्वय आहे. सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदैव तत्पर आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं असून कोरोनाचं संकट गेल्यानंतर मुख्यमंत्री सर्वाचं ऐकून घेतील, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आज काँग्रेसला चिमटा काढला होता. 

'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र, आता सर्वकाही ठिक असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीवेळीही राज्यात राष्ट्रवादीने काँग्रेसशी चर्चा न करता दुसरा उमेदवार उतरवला होता. ज्यावेळी राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाचे २ उमेदवार जिंकणे सहज शक्य होतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यास भाग पाडलं. सत्तेत समान वाटा मिळेल असं सरकार स्थापन करण्यापूर्वी ठरलं होतं असंही ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. आता राज्यपाल कोट्यातील १२ जागांमध्ये प्रत्येक पक्षाला समसमान जागा मिळायला हव्यात, पण आता राष्ट्रवादी-शिवसेना विधानसभेतील जागांनुसार वाटप करण्याचं योजत आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण होते असं ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण