शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
4
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
5
नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
6
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
7
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
8
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
9
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
10
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
12
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
13
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
14
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
15
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
16
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
17
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
18
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
19
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
20
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
Daily Top 2Weekly Top 5

"...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 12:29 IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं.

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना महाविकास आघाडी सरकारमध्येही नाराजी असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी नोकरशहांवर मंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप केला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा मुद्दा समोर आणणार आहे असं त्यांनी सांगितले होते. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून लवकरच मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन चर्चा करतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं. तर, एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अशोक चव्हाण म्हणाले की, अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सरकारमध्ये काही मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे असं सांगत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करुन घ्यावं अशी आग्रही मागणी केली होती. तसेच भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला साथ दिली आहे, याचा अर्थ काँग्रेस कमकुवत आहे असं नाही. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांचे ऐकलं जात नाही. तिन्ही पक्षाचं मिळून हे सरकार बनलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चित काँग्रेसचं जे म्हणणं आणि मुद्दे असतील ते ऐकून त्यावर तोडगा काढतील अशी अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यानंतर, आता खासदार संजय राऊत यांनी सर्वकाही ठिक असल्याचं म्हटलंय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारच्या सर्वच मंत्र्यांसोबत चांगला समन्वय आहे. सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सदैव तत्पर आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी बोलणं झालं असून कोरोनाचं संकट गेल्यानंतर मुख्यमंत्री सर्वाचं ऐकून घेतील, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आज काँग्रेसला चिमटा काढला होता. 

'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र, आता सर्वकाही ठिक असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीवेळीही राज्यात राष्ट्रवादीने काँग्रेसशी चर्चा न करता दुसरा उमेदवार उतरवला होता. ज्यावेळी राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाचे २ उमेदवार जिंकणे सहज शक्य होतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यास भाग पाडलं. सत्तेत समान वाटा मिळेल असं सरकार स्थापन करण्यापूर्वी ठरलं होतं असंही ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. आता राज्यपाल कोट्यातील १२ जागांमध्ये प्रत्येक पक्षाला समसमान जागा मिळायला हव्यात, पण आता राष्ट्रवादी-शिवसेना विधानसभेतील जागांनुसार वाटप करण्याचं योजत आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह निर्माण होते असं ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण