शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 07:44 IST

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

जळगाव/नाशिक : जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव व पारोळा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पारोळा तालुक्यात एकाच रात्री तब्बल ८३ मिमी. पाऊस झाला आहे. यासह भडगाव तालुक्यात ७५, तर अमळनेर तालुक्यात ६५ मिमी. पाऊस झाला आहे. पाचोरा व एरंडोल तालुक्यातही जोरदार पावसाने धुवून काढले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात एकूण ४८ मिमी. पाऊस झाला होता, तर सप्टेंबर महिन्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी एकूण ४९ मिमी पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात एकाच रात्री एकूण ३६ मिमी. पाऊस झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात १३ मिमी. पाऊस झाला होता. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसात जिल्ह्यात ४९ मिमी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या सरासरीत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अजुनही  प्रतिक्षा कायम आहे.

नाशिकच्या चार धरणांतून विसर्ग सुरू नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गोदावरी नदीत बस अडकल्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील चार धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून ३०० क्यूसेक, कडवा धरणातून १६९६ क्यूसेक, पालखेड धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातूनही १०४० क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. 

खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यूदेवळा (नाशिक) : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा रवींद्र नामदास या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खामखेडा येथे गुरुवारी दुपारी घडली. खामखेडा येथे अनेक वर्षांपासून स्थायिक झालेले नामदास कुटुंबीय परिसरात मेंढी पालन करून उदरनिर्वाह करतात. रानात मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर दुपारी  नामदास कुटुंबीयांना केदा दिसला नाही. त्याचा मृतदेह परिसरातील खड्ड्यात बुडालेला आढळून आला.

वार्षिक सरासरी ओलांडलीनांदेड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १७.५० मिलिमीटर पाऊस झाला. बिलोली तालुक्यामध्ये आदमपूर मंडळामध्ये २४ तासात ६७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून, प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आणि अर्धापूर या तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

मराठवाड्याला तूर्तास दिलासा!लातूर जिल्ह्यात सर्वत्र २४ तासांत १३ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. परभणी, हिंगोली, बीड,जालना जिल्ह्यात गुरुवारपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरुच होता. छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यातही जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही दोन दिवस सर्वदूर पाऊस पडत असून  विष्णूपुरी धरण ८४ टक्के भरले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात रिपरिप कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात पावसाची भुरभुर होती. दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्याला जोर नव्हता. सांगली जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या. इस्लामपूर, शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातही सरी पडल्या. सातारा जिल्ह्यात दहा दिवसांनतंर कोयना धरण क्षेत्रात पाऊस झाला. महाबळेश्वरला सर्वाधिक ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सोलापूर जिल्ह्यातही पाऊस झाला. 

कोकणात दमदार पुनरागमनसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपर्यंत संततधार सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रJalgaonजळगावNashikनाशिक