शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महिन्याने परतला, धो धो बरसला; राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवार पुन्हा फुलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 07:44 IST

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

जळगाव/नाशिक : जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव व पारोळा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पारोळा तालुक्यात एकाच रात्री तब्बल ८३ मिमी. पाऊस झाला आहे. यासह भडगाव तालुक्यात ७५, तर अमळनेर तालुक्यात ६५ मिमी. पाऊस झाला आहे. पाचोरा व एरंडोल तालुक्यातही जोरदार पावसाने धुवून काढले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात एकूण ४८ मिमी. पाऊस झाला होता, तर सप्टेंबर महिन्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी एकूण ४९ मिमी पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात एकाच रात्री एकूण ३६ मिमी. पाऊस झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात १३ मिमी. पाऊस झाला होता. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसात जिल्ह्यात ४९ मिमी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या सरासरीत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अजुनही  प्रतिक्षा कायम आहे.

नाशिकच्या चार धरणांतून विसर्ग सुरू नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गोदावरी नदीत बस अडकल्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील चार धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून ३०० क्यूसेक, कडवा धरणातून १६९६ क्यूसेक, पालखेड धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातूनही १०४० क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. 

खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यूदेवळा (नाशिक) : शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून केदा रवींद्र नामदास या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खामखेडा येथे गुरुवारी दुपारी घडली. खामखेडा येथे अनेक वर्षांपासून स्थायिक झालेले नामदास कुटुंबीय परिसरात मेंढी पालन करून उदरनिर्वाह करतात. रानात मेंढ्या चारून घरी परतल्यानंतर दुपारी  नामदास कुटुंबीयांना केदा दिसला नाही. त्याचा मृतदेह परिसरातील खड्ड्यात बुडालेला आढळून आला.

वार्षिक सरासरी ओलांडलीनांदेड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १७.५० मिलिमीटर पाऊस झाला. बिलोली तालुक्यामध्ये आदमपूर मंडळामध्ये २४ तासात ६७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून, प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आणि अर्धापूर या तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

मराठवाड्याला तूर्तास दिलासा!लातूर जिल्ह्यात सर्वत्र २४ तासांत १३ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. परभणी, हिंगोली, बीड,जालना जिल्ह्यात गुरुवारपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरुच होता. छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यातही जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही दोन दिवस सर्वदूर पाऊस पडत असून  विष्णूपुरी धरण ८४ टक्के भरले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात रिपरिप कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात पावसाची भुरभुर होती. दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्याला जोर नव्हता. सांगली जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या. इस्लामपूर, शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातही सरी पडल्या. सातारा जिल्ह्यात दहा दिवसांनतंर कोयना धरण क्षेत्रात पाऊस झाला. महाबळेश्वरला सर्वाधिक ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सोलापूर जिल्ह्यातही पाऊस झाला. 

कोकणात दमदार पुनरागमनसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपर्यंत संततधार सुरू होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रJalgaonजळगावNashikनाशिक