शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पुरग्रस्त विद्यार्थ्यांना ‘कृषी’च्या तिसऱ्या फेरीत मिळणार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 15:16 IST

दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल..

ठळक मुद्देराज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत

पुणे : अतिवृष्टी, महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य झालेले नाही. त्यामुळे राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेश फेरीत संधी दिली जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड होऊनही महाविद्यालयात जाऊ न शकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.राज्यातील चार कृषी विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयांमधील बीएससी कृषी, उद्यानविद्या, वनविद्या यांसह आठ पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कृषी परिषदेमार्फत राबविली जात आहे. राज्यात एकुण ११ हजार ७३० प्रवेश क्षमता आहे. या प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी (दि. १२) अंतिम मुदत आहे. तर तिसरी फेरी दि. १६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, राज्यातील विविध भागात झालेली अतिवृष्टी तसेच सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील महापुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे शक्य झालेले नाही. त्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची टांगती तलवार आहे. पण परिषदेने या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी माहिती देताना कौसडीकर म्हणाले, महापुर तसेच अतिवृष्टीमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी दुसºया फेरीची मुदत दि. १३ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. पण त्यानंतर या फेरीत निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता आलेला नाही. सांगली व कोल्हापुरमधील विद्यार्थी बाहेर जाऊ शकले नाहीत. तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी याभागात येऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी निवड होऊनही प्रवेश घेतले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना तिसºया फेरीमध्ये संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या  फेरीत मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश द्यायचा की प्रक्रियेनुसार प्रवेश द्यावा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्रवेश घेतलेल्या किंवा प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशासाठी दि. १९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पीएचडीची दि. १० ऑगस्ट रोजी होणारी प्रवेश परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे कौसडीकर यांनी सांगितले.----------

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीfloodपूरSangliसांगलीSatara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी