शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:11 IST

पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गाजलेल्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळचे मित्र असलेले जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलेला पाहायला मिळाला. 

सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवारांनी दोन वेळा भाजपसोबत शपथविधी घेतल्याचा अप्रत्यक्ष दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन-तीन दिवसांत आमचा पक्ष वेगळा झाला. २०१९ रोजी दीड-दोन दिवसांचे सरकार होते. त्या सरकारमध्येही काही प्रकल्पांना क्लीन चीट देण्याचे काम झाले, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीने सुरू केलेल्या ‘टू द पॉइंट पॉडकास्ट’ या मुलाखत कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी हे आरोप केले. खासदार अमोल कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गंभीर असतील तर खोलात जातील?मी १५ वर्षे आघाडी सरकारमध्ये होतो. माझ्यासमोर हा भ्रष्टाचाराचा विषय आला नाही. त्यामुळे मी त्या खोलात कधी गेलो नाही. मात्र, ज्यांनी हे आरोप केले, त्यांच्यावर आता ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने हा आरोप केल्याने ते गंभीर असतील तर याच्या खोलात जातील. त्यांचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, आता त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे, असा उपरोधिक सल्लाही जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.

आरोपापूर्वीच भाजपबरोबर जाण्याचा निर्णय : पवार

जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार गेले तेव्हापासूनच भाजपबरोबर जायचे चालले होते. त्यावेळीच सगळ्यांनी याबाबतच्या पत्रावर सह्या करून निर्णय घेतला होता, असा दावा अजित पवार यांनी केला.पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, तेव्हा कुठला आरोप नव्हता. आरोप झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेत अनियमितता झाल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, असे सांगत पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. 

जिल्हा नियोजन मंडळात टक्केवारीपुणे जिल्हा नियोजन मंडळात दिलेली कामे दोन वर्षे मंजूर होत नाहीत. मात्र, ठराविक पक्षाच्या लोकांना कामे दिली जातात, असा आपला अनुभव असल्याचे मुलाखतकार कोल्हे यांनी जयंत पाटील यांना विचारले असता, जिल्हा नियोजन मंडळात काही मंत्र्यांकडून टक्केवारी सुरू झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.या आरोपावर पवारांनी उत्तर दिले. मी पुण्याचा पालकमंत्री आहे. कुणी ०००.१ टक्के मागितले असल्यास दाखवा, राजकारण सोडेन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी