शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीत आरोपाचे पाट; जयंत पाटील म्हणतात त्यामुळेच भाजपसोबत, तर अजित पवार म्हणतात त्यापूर्वीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:11 IST

पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गाजलेल्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळचे मित्र असलेले जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शुक्रवारी आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलेला पाहायला मिळाला. 

सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवारांनी दोन वेळा भाजपसोबत शपथविधी घेतल्याचा अप्रत्यक्ष दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन-तीन दिवसांत आमचा पक्ष वेगळा झाला. २०१९ रोजी दीड-दोन दिवसांचे सरकार होते. त्या सरकारमध्येही काही प्रकल्पांना क्लीन चीट देण्याचे काम झाले, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीने सुरू केलेल्या ‘टू द पॉइंट पॉडकास्ट’ या मुलाखत कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी हे आरोप केले. खासदार अमोल कोल्हे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गंभीर असतील तर खोलात जातील?मी १५ वर्षे आघाडी सरकारमध्ये होतो. माझ्यासमोर हा भ्रष्टाचाराचा विषय आला नाही. त्यामुळे मी त्या खोलात कधी गेलो नाही. मात्र, ज्यांनी हे आरोप केले, त्यांच्यावर आता ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने हा आरोप केल्याने ते गंभीर असतील तर याच्या खोलात जातील. त्यांचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, आता त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे, असा उपरोधिक सल्लाही जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.

आरोपापूर्वीच भाजपबरोबर जाण्याचा निर्णय : पवार

जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. सिंचन घोटाळ्याच्या आरोपात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार गेले तेव्हापासूनच भाजपबरोबर जायचे चालले होते. त्यावेळीच सगळ्यांनी याबाबतच्या पत्रावर सह्या करून निर्णय घेतला होता, असा दावा अजित पवार यांनी केला.पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, तेव्हा कुठला आरोप नव्हता. आरोप झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेत अनियमितता झाल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, असे सांगत पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत बसता, दाखवा तरी ७० हजार कोटी रुपये, त्यातील ३५ हजार कोटी तुला देऊन टाकतो, अशा उद्विग्न शब्दांत अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले. 

जिल्हा नियोजन मंडळात टक्केवारीपुणे जिल्हा नियोजन मंडळात दिलेली कामे दोन वर्षे मंजूर होत नाहीत. मात्र, ठराविक पक्षाच्या लोकांना कामे दिली जातात, असा आपला अनुभव असल्याचे मुलाखतकार कोल्हे यांनी जयंत पाटील यांना विचारले असता, जिल्हा नियोजन मंडळात काही मंत्र्यांकडून टक्केवारी सुरू झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.या आरोपावर पवारांनी उत्तर दिले. मी पुण्याचा पालकमंत्री आहे. कुणी ०००.१ टक्के मागितले असल्यास दाखवा, राजकारण सोडेन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी