शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी अबू फैजलच्या अटकेपासून एटीएस मुकले

By admin | Updated: July 11, 2014 09:01 IST

बुलडाणा जिल्ह्यातील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी व इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अबू फैजल इम्रानखान याच्या अटकेपासून एटीएसला मुकावे लागेल.

मध्य प्रदेश पोलिसांचे मिळाले नाही एस्कॉर्ट : पुन्हा प्रयत्ननागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-सैलानी येथील दहशतवादी कृत्यप्रकरणी सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता जहाल दहशतवादी डॉ. अबू फैजल इम्रानखान याला नागपुरात आणण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचे ‘एस्कॉर्ट’ न मिळाल्याने दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तूर्त त्याच्या अटकेपासून मुकावे लागले. अबूला मध्य प्रदेश पोलिसांनी नागपूरच्या न्यायालयात हजर करावे, यासाठी नव्याने वॉरंट जारी करण्याच्या संदर्भात १६ जुलै रोजी एटीएस पुन्हा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.डी. परवाणी यांच्या न्यायालयात अर्ज करणार आहे. अबू फैजल हा सध्या भोपाळच्या कारागृहात आहे. त्याला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्याच्या संदर्भात या न्यायालयाने २७ जून २०१४ रोजी वॉरंट जारी केला होता. हा वॉरंट आधी भोपाळच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात गेला. या न्यायालयाने अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर करण्यात यावे यासाठी तेथील जेल अधीक्षकाच्या नावे वॉरंट जारी केला. येथील कारागृह प्रशासनास अबूला नागपुरात नेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांचा एस्कॉर्ट उपलब्ध झाला नाही. मध्य प्रदेशचे काही पोलीस कर्मचारी आज नागपुरात आले आणि त्यांनी स्थानिक एटीएसला ही माहिती दिली. लागलीच पोलीस निरीक्षक व्ही. डी. मिश्रा हे विशेष सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन यांच्यासह प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी अबूच्या वॉरंटसाठी नव्याने अर्ज करता यावा म्हणून तारीख मागितली. न्यायालयाने १६ जुलै ही तारीख मंजूर केली. मध्य प्रदेश पोलिसांनी अबूला नागपूरच्या न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएसचे पथक त्याला सैलानी दर्गाप्रकरणी अटक करणार आहेत. अबूचा मोमीनपुऱ्यात संचारया गटाचा म्होरक्या डॉ. अबू फैजल आहे. हे सर्व दहशतवादी मध्य प्रदेश आणि विदर्भाचे नेटवर्क सांभाळून होते. अबू हा २६ जुलै २००८ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य आरोपी आहे. २००९ मध्ये खंडव्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात या दहशतवाद्यांविरुद्ध भादंविच्या ३०७, २९५, १२४ अ, १५३ क, १२० ब, २१२, ३४, शस्त्र कायद्याच्या २५, २७, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१०), (१३), (१५), (२०) कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सामान्य आणि विशेष नागरिकांच्या हत्येचा प्रयत्न करून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवादी कृत्य करणे, असा आरोप या गटावर आहे. अकिल खिलजी हा बाबरी विध्वंसानंतर सक्रिय झालेला आहे. तो मुस्लीम तरुणांमध्ये जिहादची भावना निर्माण करायचा, खलील हा त्याचा मुलगा आहे. अबरार हा मोमीनपुरा भागात राहिलेला आहे. खांडवा येथे एटीएसच्या शिपायाला गोळ्या घालून ठार केल्यानंतर अबरार हा एटीएसच्या रडारवर आला होता. अबरार हा मोमीनपुऱ्यात आश्रयाला असताना त्याला अबू फैजल भेटायचा.