शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:16 IST

वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याला मंजुरी दिली. आरती साठे यांनी भाजपच्या प्रवक्त्या म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, त्यांनी नंतर राजीनामा दिला. आता त्याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या नियुक्तीवर टीका सुरू केली आहे. त्याला भाजपकडून जुने दाखल देत उत्तर देण्यात आला. 'काँग्रेसवाल्यांनोरोहित पवार आता याचे उत्तर द्या', असे आव्हानच भाजपने दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबई उच्च न्यायालयात रिक्त झालेल्या जागांवर तीन वकिलांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याला मंजुरी दिली. न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तीन व्यक्तींमध्ये एक नाव वकील आरती साठे यांचेही आहे. त्याच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर देत उलट सवाल केला.  

"आरती साठेंचा आणि भाजपचा काही संबंध नाही" 

रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले, "भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली. त्यांचा व भाजपाचा काहीही आता संबंध नाही. न्यायमूर्तींच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस पक्ष व रोहित पवार टीका करत आहे. काँग्रेसवाल्यांनो व रोहीत पवार आता याचे उत्तर द्या", असे आव्हान देत त्यांनी जुने दाखले दिले. 

भाजपने कोणाचे उदाहण दिले?

केशव उपाध्ये म्हणाले, "न्या. बहरूल इस्लाम हे काँग्रेस तर्फे एप्रिल 1962 मध्ये राज्य सभेवर निवडून गेले. 68 मध्येही ते राज्य सभेवर निवडून गेले. या काळात त्यांनी आसाम विधानसभा निवडणूक ही लढवली होती पण ते पराभूत झाले. 1972 मध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मार्च 1980 मध्ये ते निवृत्त झाले आणि पुन्हा राजकारणात सक्रीय झाले."

"निवृत्त झाल्यावर इंदिरा गांधी सरकारने त्यांना डिसेंबर 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केले. 1983 मध्ये त्यावेळचे बिहार चे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची भ्रष्टाचार खटल्यात निर्दोष मुक्तता केल्यानंतर टीका झाल्यावर त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 1983 मध्येच काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले", असे म्हणत केशव उपाध्ये यांनी विरोधकांना उत्तर दिले. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टBJPभाजपाcongressकाँग्रेसRohit Pawarरोहित पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय