शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:16 IST

वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याला मंजुरी दिली. आरती साठे यांनी भाजपच्या प्रवक्त्या म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, त्यांनी नंतर राजीनामा दिला. आता त्याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवारांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या नियुक्तीवर टीका सुरू केली आहे. त्याला भाजपकडून जुने दाखल देत उत्तर देण्यात आला. 'काँग्रेसवाल्यांनोरोहित पवार आता याचे उत्तर द्या', असे आव्हानच भाजपने दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबई उच्च न्यायालयात रिक्त झालेल्या जागांवर तीन वकिलांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने याला मंजुरी दिली. न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तीन व्यक्तींमध्ये एक नाव वकील आरती साठे यांचेही आहे. त्याच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर देत उलट सवाल केला.  

"आरती साठेंचा आणि भाजपचा काही संबंध नाही" 

रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले, "भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर दीड वर्षांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून आरती साठे यांची नियुक्ती झाली. त्यांचा व भाजपाचा काहीही आता संबंध नाही. न्यायमूर्तींच्या कॉलेजियमच्या निर्णयानुसार केलेल्या नियुक्तीवर काँग्रेस पक्ष व रोहित पवार टीका करत आहे. काँग्रेसवाल्यांनो व रोहीत पवार आता याचे उत्तर द्या", असे आव्हान देत त्यांनी जुने दाखले दिले. 

भाजपने कोणाचे उदाहण दिले?

केशव उपाध्ये म्हणाले, "न्या. बहरूल इस्लाम हे काँग्रेस तर्फे एप्रिल 1962 मध्ये राज्य सभेवर निवडून गेले. 68 मध्येही ते राज्य सभेवर निवडून गेले. या काळात त्यांनी आसाम विधानसभा निवडणूक ही लढवली होती पण ते पराभूत झाले. 1972 मध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. मार्च 1980 मध्ये ते निवृत्त झाले आणि पुन्हा राजकारणात सक्रीय झाले."

"निवृत्त झाल्यावर इंदिरा गांधी सरकारने त्यांना डिसेंबर 1980 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केले. 1983 मध्ये त्यावेळचे बिहार चे मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची भ्रष्टाचार खटल्यात निर्दोष मुक्तता केल्यानंतर टीका झाल्यावर त्यांनी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 1983 मध्येच काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले", असे म्हणत केशव उपाध्ये यांनी विरोधकांना उत्तर दिले. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टBJPभाजपाcongressकाँग्रेसRohit Pawarरोहित पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय