शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
6
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
7
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
8
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
9
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
10
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
11
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
12
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
13
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
14
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
15
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
16
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
17
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
18
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
19
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
20
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:40 IST

Maharashtra local body elections: शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विरोधी पक्षांचे उमेदवार पडून सत्ताधारी पक्षांचे उमेदवार जिंकतील, अशा प्रारूप याद्या बनविण्यात आल्या. हा घोळ पाहता ही निवडणूक ‘गेम सेट मॅच’ केली आहे, असा आरोप आ. आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. अशा निवडणुका घेण्याची गरज नसून ‘इलेक्शन’ऐवजी थेट ‘सिलेक्शन’च करा, अशी टीका  केली. 

निवडणुकांसाठी २ जुलै २०१५ ची मतदारयादी निवडणूक आयोगाने ग्राह्य धरली आहे. त्यामुळे या काळात १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. ७ नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणाऱ्या प्रारूप यादीची तारीख पुढे ढकलून ती २० नोव्हेंबर केली. जाहीर केलेली यादी ‘मशीन रीडेबल’ नसल्याने  गोंधळ झाला आहे, असे ते म्हणाले.

आठवड्यात यादीतील गोंधळ जनतेसमोर आणणार

सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांचे उमेदवार पडतील अशा प्रकारे प्रारूप याद्या बनविल्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी एका बूथमधील अनेक मतदार दुसऱ्या बूथमध्ये हलवले आहेत. त्यामुळेच या याद्या येण्यासाठी वेळ लागला. वॉर्ड बनवणे, वॉर्डाच्या सीमारेषा आखणे जमले नाही. यादीच्या यादी उचलून दुसऱ्या यादीत टाकली आहे. या अत्यंत किचकट यादीत तुमची इमारत, तुमचे नाव यादीत आहे की नाही ते कळत नाही. या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरू असून, येत्या आठवड्यात यादीतील गोंधळ जनतेसमोर आणू. काम न जमणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवणे गरजेचे आहे. हे जाणूनबुजून केले असल्यास जनतेचा मतदानाचा हक्क हिसकावला म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Aditya Thackeray Slams Voter List Chaos: 'Selection' Over 'Election'!

Web Summary : Aditya Thackeray accuses the Election Commission of creating biased voter lists favoring ruling parties. He alleges deliberate manipulation, demanding action against responsible officials and threatening to expose irregularities within a week, even calling for treason charges.
टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण