शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 10:22 IST

पोटनिवडणुकांनी शिवसेनेला उभारी दिली. ताकद दिली होती. शिवसेना वाढली, ती पोटनिवडणुकीच्या माध्यमातूनच..!

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई शिवसेनेच्या हातातून धनुष्यही गेले आणि नावही..! अंधेरी विधानसभेची पाेटनिवडणूक तोंडावर आलेली असताना हा बसलेला झटका अपेक्षित असला तरी मोठा आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर शिवसेनेला कायम संघर्ष करावा लागला आहे. मात्र, त्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आजची राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी केलेले बंड हे त्यांच्या पुरते होते. त्यावेळी शिवसेना सर्वार्थाने पॉवरफुल होती. एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेला मुळापासून हलवून गेले आहे. चिन्ह कोणाकडे राहणार, हा प्रश्नही निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपुरता निकाली काढला आहे. खऱ्या अर्थाने, आता ठाकरे गटाला शून्यातून सगळी उभारणी करावी लागणार आहे. 

याआधीच्या पोटनिवडणुकीचा इतिहास वेगळा होता. त्या पोटनिवडणुकांनी शिवसेनेला उभारी दिली. ताकद दिली होती. शिवसेना वाढली, ती पोटनिवडणुकीच्या माध्यमातूनच..! १९७० ला कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या खुनानंतर लालबाग- परळ विधानसभेची पोटनिवडणूक झाली. तिथे वामनराव महाडिक पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर जो विजयी मेळावा झाला तो भूतो न भविष्यती असा होता. प्रचंड संख्येने मुंबईकर आणि शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यातून शिवसेनेची मुंबईत वाढ होण्याला मोठी मदत झाली होती. त्यामुळेच १९८५ ला शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत आली.पुढे तत्कालीन काँग्रेसचे आमदार हंस भुग्रा यांच्या निधनामुळे १९८७ ला विलेपार्ले मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत जनता पार्टीच्या वतीने प्राणलाल व्होरा, काँग्रेसच्या वतीने प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेच्या वतीने रमेश प्रभू मैदानात उतरले होते. ही तिरंगी लढत होती. त्यात रमेश प्रभू विजयी झाले. १९८७ ची ही पोटनिवडणूक सर्वार्थाने गाजली ती बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळे. जनता पार्टी विरोधात असताना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. निवडणूक रमेश प्रभू जिंकले. प्रभाकर कुंटे दोन नंबरवर होते. निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणला गेला म्हणून, प्रभाकर कुंटे यांनी त्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले होते. हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीत घेतला म्हणून न्यायालयात गेलेली ही पहिली निवडणूक होती.

 मात्र, प्रभाकर कुंटे यांना त्यात पराभव पत्करावा लागला आणि शिवसेनेचे हिंदुत्व पुन्हा प्रकर्षाने समोर आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या उघड पुरस्कारापासून भाजप स्वतःला वेगळी ठेवू शकली नाही. नंतरच्या दोन वर्षातच ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे...’ या घोषणा सुरू झाल्या.त्यानंतरच शिवसेना विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगाने वाढली. आता पुन्हा एकदा त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे. समोर अंधेरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. १९८७ ला विलेपार्लेची पोटनिवडणूक होती. आता एक स्टेशन पुढे, अंधेरीची पोटनिवडणूक आहे. अंधेरी- विलेपार्ले या दोन स्टेशनमध्ये अंतर कमी असले तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यात खूप अंतर पडले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कट्टरपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता त्याच्या नेमकी उलट भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. तर हिंदुत्वाचा; आडून पुरस्कार करणारी भाजप ठामपणे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे आली आहे. त्याला साथ देण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी केले. बदलत्या काळाला कवेत घेत, उद्धव ठाकरे यांनी उदारमतवादाचा मार्ग स्वीकारला. नेमके त्यालाच आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या हिंदुत्वासोबत जात उद्धव ठाकरे यांना उघडे पाडण्याचे काम केले आहे. 

आता खरी परीक्षा उद्धव ठाकरे यांची आहे. ज्या भाजपकडे स्वतःचे चिन्ह आहे ती भाजप पोटनिवडणूक लढवणार आहे. ज्यांनी हिंदुत्वाच्या नारा देत बंड केले ते एकनाथ शिंदे या निवडणुकीत कुठेही नाहीत, आणि ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे ना धनुष्य आहे ना बाण..! अशा परिस्थितीत त्यांच्याकडे फक्त बाळासाहेबांचे नाव आहे; पण ते तर एकनाथ शिंदे यांच्याकडेही आहे. अशा परिस्थितीत ठाकरे यांना शून्यातून स्वतःला व पक्षाला उभे करायचे आहे. सोबत नवे चिन्हही घ्यायचे आहे. एकदा चिन्ह गोठवले गेले की ते पुन्हा परत मिळाले, अशी एकही घटना भारताच्या राजकीय इतिहासात नाही. उद्धव ठाकरेंकडे आता ना धनुष्यबाण राहिला, ना शिवसेनेचे नाव. त्यांना आता धनुष्यबाणाविना तलवार उपसावी लागणार आहे. थोडक्यात, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर हे ‘पुनश्च हरी ओम’ आहे...!

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे