शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 09:04 IST

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत विदर्भातील मुलीनं जिद्द उराशी बाळगत समाजासाठी शैक्षणिक दरवाजे उघडले.

नागपूर - ना डोक्यावर छत, ना राहण्यासाठी घर...जेवणही मिळणं कठीण, कुटुंबाकडे जमीन नाही, कामधंदा नाही. दोन वेळच्या अन्नासाठी दारोदार भटकावं लागायचं. तिचे आई वडील भीक मागून जे काही आणायचे त्यावर तिचं पोट भरायचं. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. बस्स हेच तिचं जीवन होतं.परंतु जगण्याच्या या संघर्षात तिने एक जिद्द उराशी बाळगली. जिद्द होती स्वत:ला बदलण्याची, कुटुंबाला गरिबीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याची. ज्या समाजातून ती येते, त्या समाजासाठी एक प्रेरणादायी बनण्याची. ही कहाणी आहे आदिवासी नाथजोडी समाजातून येणारी १६ वर्षीय मुलगी रमाबाई चव्हाण हिची. 

महाराष्ट्राच्या दुष्काग्रस्त विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एका छोट्या वस्तीत राहणाऱ्या रमाबाईनं तिच्या समाजाच्या सर्व परंपरांना छेद देत एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय होता, भीक न मागता शिक्षण घेत नवीन उंची गाठत कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्याचा.मला १० वीची परीक्षा द्यायचीय असं तिने घरच्यांना सांगितले. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती, १० वीच्या शिक्षणासाठी पुस्तके खरेदी करता येतील इतकेही पैसे नव्हते. वर्गात जे काही शिकेल ते केवळ आठवणीत ठेवणे यावरच रमाबाईला अवलंबून राहावं लागायचे. परीक्षेची तारीख जवळ आली, तेव्हा रमाबाईच्या मनात भीती होती. जे शिक्षण तिने कुठलंही पुस्तकं न वाचता घेतले आहे त्याच्या भरवशावर १० वीची परीक्षा कशी द्यायची? तिच्या या भीतीला एका शिक्षकाने दूर करत तिला हिंमत दिली. 

जर तुला तुझ्या समाजासाठी खरेच काही करायचे असेल तर न भीता परीक्षा दे, ही परीक्षा केवळ १० वीची नाही तर तुझं आयुष्य बदलणारी परीक्षा आहे असं शिक्षकाने रमाबाईला सांगितले. रमाबाईनं परीक्षा दिली आणि जेव्हा निकाल आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रमाबाई तिच्या आदिवासी समुदायात १० वीची परीक्षा पास होणारी पहिलीच मुलगी होती. रमाबाईचं हे यश तिच्या संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा आहे. रमाबाई ही नाथजोगी समाजातून येते जे दारोदार भीक मागून त्यांचे आयुष्य जगतात. हे लोक अत्यंत गरीब असतात, २ वेळच्या जेवणासाठी या लोकांना संघर्ष करावा लागतो. रमाबाई सांगते, माझे आई वडील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा याठिकाणी जेवणासाठी भीक मागायला गेले होते. मागील अनेक पिढ्यापासून आमच्या समाजातील लोकांचे हे वास्तव आहे. त्यामुळेच हा समाज कुठल्याही एका जागेवर स्थिरावला नाही. आमच्याकडे शेती नाही. दुसऱ्यांकडे काम करण्यासाठी कुठलेही शिक्षण नाही. त्यामुळेच हे लोक पूर्णपणे इतरांनी दिलेल्या भीकेवर त्यांचे जीवन जगत असतात. 

रमाबाईच्या या यशात सर्वात मोठं योगदान होतं ते कार्तिक नाथजोगीचं, तिच्या गावात राहणारा कार्तिक मराठी साहित्य आणि पॉलिटिक्स सायन्समध्ये पदवीधर आहे. कार्तिकनेच रमाबाईला शिक्षणाचं महत्त्व समजावलं. या समाजातील मुलींचे लहान वयातच लग्न केली जातात. या समाजाला मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी कार्तिक काम करतो, तिथल्या मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करतो. आमच्या गावातील मुले कायम त्यांच्या आईवडिलांसोबत भीक मागायला जातात. शिक्षणात त्यांना रस नसतो असं त्याने सांगितले. या समाजाला पुढे आणण्यासाठी कार्तिकनं अनेक नेत्यांचे दरवाजे खटखटले.परंतु कुणी मदत केली नाही. मात्र कार्तिकनं प्रत्येकाकडून १०-१० रुपये मागून टीन शेडचे वर्ग बनवले. याच पैशातून त्याने पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणून मुलांना शिक्षण देणे सुरू केले. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीssc examदहावी