शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

 सरकारकडून समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी : राधाकृष्ण विखे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 20:52 IST

मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी पीक विमा योजनेचा खरी लाभार्थी रिलायन्स कंपनी कृषी पुरस्कार मिळालेल्यांची व्याख्याने संशोधकांसमोर ठेवणे गरजेचेनसीम खान यांच्यावर पैशांची उधळण केल्याचा प्रकार चुकीचाकेंद्र आणि राज्य सरकार खोटे आकडे सांगण्यात आणि आकड्यांचा खेळ खेळण्यात माहीर

पुणे : मुंबई आणि नागपुरला जोडण्यासाठी भाजपा सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीचे नाव देखील माहीत असून योग्य वेळ आल्यानंतर ते जाहीर करणार आहे, असे ते म्हणाले.        आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपांचे पुढे काय झाले? तसेच समृद्धी महामागार्बाबत झालेल्या प्रकाराच्या सर्वांच्या मागे कोण आहे, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार राज्यात सत्ता येऊन चार वर्ष झाली. त्या दरम्यान त्यांनी सिंचन प्रकल्पावर किती काम केले. याची श्वेतपत्रिका काढावी. अशी मागणी देखील त्यांनी केली.       काँग्रेस पक्षाचे नेते नसीम खान यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान पैशांची उधळण केली जात असल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण केल्याचा प्रकार योग्य नाही. असे प्रकार होऊ नये, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.      नैसर्गिक आपत्तींपासून शेतक-यांना संरक्षण मिळावे, शेतक-यांना सुरक्षितता वाटावी, यासाठी शासनाकडून शेतकरी पीक विमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा खरा लाभार्थी रिलायन्स कंपनी आहे. शेतक -याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. सरकारकडून शेतक-यांसाठी राबविण्यात आलेल्या पीक विमा योजनेचा आत्तापर्यंत ४ हजार कोटी रुपये विमा प्रिमीयम भरला आहे. मात्र नुकसानग्रस्त शेतक-यांना केवळ १ हजार ६०० कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे विमाकंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा फायदा झाला असून त्यातील सर्वाधिक वाटा हा रिलायन्स इंन्शुरन्स कंपनीला मिळाला आहे. त्यामुळे ही योजना शेतक-यांसाठी आहे, की विमा कंपन्यांसाठी, हेच कळत नाही.       काँग्रेस सरकारच्या काळात महसुलात १८ टक्के वाढ होती. या सरकारच्या काळात हा आकडला ११ टक्के झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकार खोटे आकडे सांगण्यात आणि आकड्यांचा खेळ खेळण्यात माहीर आहे. यातून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असाही आरोप विखे पाटील यांनी केला.जलयुक्त शिवार योजनेवर टिकास्त्र सोडत विखे-पाटील म्हणाले, जलयुक्त नव्हे झोल युक्त शिवार योजना आहे. कृषिसाठी विभागवार वेगवेगळे धोरण असणे गरजेचे आहे. कृषी पुरस्कार मिळालेल्यांची व्याख्याने संशोधकांसमोर ठेवणे गरजेचे आहे. सरकारमधील आमदार, खासदार, मंत्री फक्त शेतक-यांच्या बाजूने बोलतात, कृती मात्र शेतक-याच्या विरोधात काम करतात, असा टोलाही विखे पाटील यांनी सत्ताधा-यांना लगावला. 

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBJPभाजपाcongressकाँग्रेस