शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात ‘स्वाईन’चे ७९ बळी

By admin | Updated: February 19, 2015 01:48 IST

राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ५६९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ७० रुग्ण राज्यातील व ९ रुग्ण परराज्यातील होते,

मुंबई : राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ५६९ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील ७० रुग्ण राज्यातील व ९ रुग्ण परराज्यातील होते, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.२७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ९० हजार ८८६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.पुण्यात तरूणाचा मृत्यूपुण्यात बुधवारी स्वाइन फ्लूच्या आणखी एका रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील बळींची संख्या १८ वर पोहोचली आहे. बुधवारी ८ नवे रुग्ण सापडले असून रुग्णालयात दाखल असलेल्या १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.लातूरमध्ये एक बळीशासकीय सर्वोपचार रुग्णालयात संघमित्रा विठ्ठल तलवारे (३२, रा. गणेशनगर, अहमदपूर) या महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. यापूर्वी अहमदपुरातीलच एका महिलेचा स्वाईन फ्यूने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने सहा जणांचा बळी घेतला आहे़नाशिकमध्ये प्रशासन सक्रियजिल्ह्यात स्वाईन फ्लूने सहा बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाले आहे. आजाराचे गांभीर्य जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने सर्व तहसीलदारांना सूचना देऊन तालुका पातळीवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा व उपाययोजना करण्याचे आदेश दिले, त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केली.‘सिरम’ बनविणार स्वाइन फ्लूवरील ३ लाख लस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्वाइन फ्लूने पुन्हा थैमान माजवण्यास सुरूवात केल्याने त्याला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील सिरम इन्टिट्यूट आॅफ इंडियाने ही लस बनविण्यास सुरूवात केली असून ३ लाख डोस बनविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.स्वाइन फ्लूवर लस प्रभावी ठरत असल्याने त्याची मागणी सर्वाधिक आहे. २००९ मध्ये महाराष्ट्रासह देशात स्वाइन फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने त्यावरील लस तयार केली होती आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले होते. मात्र गेल्या ३ वर्षांत त्याची मागणी घटल्याने उत्पादन केलेल्या १ लाख ८४ हजार लसींची एक्स्पायरी डेट झाल्याने त्या सिरमने नष्ट केल्या होत्या. आता पुन्हा मागणी वाढल्याने त्याचे उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. जाधव म्हणाले, पहिल्या बॅचमधील लसीचे उत्पादन पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळेत आता त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते बाजारात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्शासकीय सर्वोपचार रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’ संशयित म्हणून उपचार घेत असलेल्या आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला़ आता सर्वोपचार रुग्णालयात एकूण ८ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी चौघांचा अहवाल पॉझिटीव्ह आहे.च्निलंगा तालुक्याच्या मालेगाव येथील मीना बालाजी इनकर (४०) यांना १६ फेब्रुवारी रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी अहमदपूर येथील गणेश नगरातील संघमित्रा विठ्ठल तलवारे (३२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ व्हायरालॉजी’कडून दोघींचाही वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही़