शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राज्यात ६७ नवीन जिल्ह्यांची मागणी, ११३ नवीन तालुक्यांचीही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 5:37 AM

राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर - राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे. याशिवाय राज्यात ११३ नवीन तालुके निर्माण करण्याची मागणीही सरकारकडे प्राप्त झाली आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात नवीन जिल्हानिर्मिती व विभाजनाबाबत ही वस्तुस्थिती स्पष्ट केली. अहमदनगरच्या उत्तर विभागाचा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचे मुख्यालय श्रीरामपूर, संगमनेर की शिर्डी येथे करायचे आहे? यावरून अनेक वर्षांपासून या जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडे पडले आहे.जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. त्यावर सरकार अभ्यास करीत आहे. अहवालाच्या तपासणीअंती धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निश्चित केल्या जाणाऱ्या धोरणानुसार व निकषानुसार नाशिक जिल्ह्याचे, तसेच अन्य जिल्ह्यांचे विभाजन व पुनर्रचना करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे उचित निर्णय घेण्यात येणार आहे.अहमदनगर, बीडसह राज्यातील २४ जिल्ह्यांचे विभाजन करून ६७ नवीन जिल्हे निर्माण करण्याची, तसेच राज्यात ११३ नवीन तालुके नवीन करण्याची मागणी विविध माध्यमांद्वारे प्राप्त झाली आहे, असे महसूलमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.तालुका विभाजनाबाबत कोकण विभागाच्या महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निकष ठरविण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार