शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 12:30 IST

भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली.

ठळक मुद्देकृष्णा-भीमा खोऱ्यात उदंड पाऊस :धरणे भरल्यानंतर भीमा नदीतून सोडले बारा पानशेतचे पाणीपुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना मावते धरणात

विशाल शिर्केपुणे : पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणे पाणी पिऊन तृप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आले. तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल सहा कोयना धरणे भरतील इतके पाणी कृष्णेत सोडण्यात आले. त्यातील तब्बल पाच कोयना धरणांचे पाणी कोल्हापूर-महाबळेश्वरच्या घाटरांगांमधून कृष्णेत आले.भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली. राज्यात उजनी धरणाची एकूण साठ्याची क्षमता सर्वाधिक ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. तर, कोयना धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता सर्वाधिक १०० टीएमसी आहे. पुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना धरणात मावते. कृष्णा खोऱ्यातील घाटमाथ्यावर ऑगस्टच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातील कराडमधे पूरस्थिती उद्भवली होती. लाखो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. कोट्यवधीरुपयांचे नुकसान या जिल्ह्यांत झाले. कृष्णेच्या प्रमुख उपनद्यांपैकी असलेल्या कोयना, दूधगंगा, पंचगंगा, वारणा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी कृष्णेत जमा झाले होते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोयना धरणासह धोम, वारणावती, दूधगंगा, राधानगरी, ऊरमोडीसह १३ प्रमुख धरणे आहेत. यात सध्या २०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी धरणात ०.४७ टीएमसी (६७ टक्के) पाणी आहे. हा अपवाद वगळता सर्व धरणात गुरुवार अखेरीस (दि. ५) ९५ ते १०० टक्के पाणीसाठा होता. ही धरणे भरल्यानंतरही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. कृष्णेत यंदाच्या मॉन्सूनमधे राजापूर बंधाऱ्यातून ४२० टीएमसी पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले. तर, दूधगंगा नदीतून जवळपास ८० टीएमसी पाणी कृष्णेत पोहचले. म्हणजेच तब्बल ५०० टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णेतून पुढे आंध्रप्रदेशाकडे वाहिले. भीमा नदीच्या खोऱ्यातही यंदा जोरदार वृष्टी झाली. या खोºयातील २३ धरणांपैकी माणिकडोह, मुळशी, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरसह १८ धरणांचे पाणी उजनी नदीत येते. उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी असून, त्यात ५३.५७ उपयुक्त आणि ६३.६५ मृतसाठा आहे. जून महिन्यात धरणातील मृतसाठा देखील उणे होता. एकट्या,खडकवासला साखळीतील धरणातून ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान २२.५० टीएमसी पाणी उजनीत जमा झाले. जिल्ह्यातील धरणातील पाण्याने उजनी धरण पूर्ण भरल्यानंतर तब्बल ७० टीएमसी पाणी भीमेत सोडण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेDamधरणriverनदीRainपाऊस