शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 19:12 IST

राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले.

नागपूर : विदर्भातील महत्वाचे व नागपूर येथील उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक जलद गतीने घडवून आणण्यासाठी व येथे पायाभूत सुविधांचे सक्षम जाळे उभे करण्यासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी माजी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केली. राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले.

२२.०९ एकर परिसरात पसरलेल्या उप्पलवाडी औद्योगिक परिसरात १०० युनिट कार्यरत असून, त्यात सुमारे ५ ते ६ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक कंपन्यांनी विस्तारही केला. येथील उद्योजकांमार्फत सांडपाणी, पाणी, मालमत्ता, आग, लाईट आदींसाठी नियमितपणे कर आणि शुल्क भरण्यात येतो. सर्व कर भरूनही प्रशासनाकडून येथील उद्योजकांना कोणतीही सुविधा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. स्वच्छता, रस्त्यांची देखभाल या मूलभूत सुविधाही दिल्या जात नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पथ दिवे नसल्याने अंधार- या परिसरातील रोडवर पथदिव्याची सुविधाही नाही. रात्री कामाकरिता येणाऱ्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अंधारात यावे लागते. पावसामुळे पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेक अपघातही झाले आहेत. परिसरात पथदिव्यांची सोय व्हावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतvidhan sabhaविधानसभा