शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:24 IST

Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. 

मुंबई - ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते. समित कदम हे फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरीही फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली असं सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांनी ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप आणण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला असा आरोप केला. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, समित कदम इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.

तसेच जर मी त्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आज उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं असतं. लहान मुलांनाही घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा यांनी प्रयत्न केला. एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला असा दावाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. मी योग्य वेळी सर्व बाहेर काढेन, मी धमकीला घाबरत नाही. समित कदमला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी गृहमंत्री असताना रोज २०० लोक घरी भेटायला यायचे, मंत्रालयात अनेकजण भेटायचे. समित कदम हादेखील मला भेटला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडून आलोय असं सांगितले, त्यावेळी मी त्याला भेटलो तेव्हा हे सर्व सांगितले असंही अनिल देशमुखांनी म्हटलं.

ठाकरेंवर कोणते खोटे आरोप करायला सांगितले?

उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री म्हणून मला बोलावलं, त्यांनी महापालिकेसाठी आम्हाला पैशांची गरज आहे तुम्ही ३०० कोटी जमा करून द्या असं मला सांगितल्याचा खोटा आरोप मला करायचा होता. तर दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप लावणं याप्रकारचे खोटे प्रतिज्ञापत्र मला समित कदमने दिले. त्याच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत ५-६ वेळा बोलले. मात्र अनिल देशमुख असे खोटे आरोप कुणावर करणार नाही. तुम्ही ज्या खालच्या प्रकारचं राजकारण करताय हे महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही असं मी देवेंद्र फडणवीसांना फोनवर बोलल्याचा दावा देशमुखांनी पत्रकार परिषदेत केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAjit Pawarअजित पवार