शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:24 IST

Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. 

मुंबई - ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते. समित कदम हे फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरीही फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली असं सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांनी ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप आणण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला असा आरोप केला. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, समित कदम इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.

तसेच जर मी त्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आज उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं असतं. लहान मुलांनाही घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा यांनी प्रयत्न केला. एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला असा दावाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. मी योग्य वेळी सर्व बाहेर काढेन, मी धमकीला घाबरत नाही. समित कदमला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी गृहमंत्री असताना रोज २०० लोक घरी भेटायला यायचे, मंत्रालयात अनेकजण भेटायचे. समित कदम हादेखील मला भेटला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडून आलोय असं सांगितले, त्यावेळी मी त्याला भेटलो तेव्हा हे सर्व सांगितले असंही अनिल देशमुखांनी म्हटलं.

ठाकरेंवर कोणते खोटे आरोप करायला सांगितले?

उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री म्हणून मला बोलावलं, त्यांनी महापालिकेसाठी आम्हाला पैशांची गरज आहे तुम्ही ३०० कोटी जमा करून द्या असं मला सांगितल्याचा खोटा आरोप मला करायचा होता. तर दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप लावणं याप्रकारचे खोटे प्रतिज्ञापत्र मला समित कदमने दिले. त्याच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत ५-६ वेळा बोलले. मात्र अनिल देशमुख असे खोटे आरोप कुणावर करणार नाही. तुम्ही ज्या खालच्या प्रकारचं राजकारण करताय हे महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही असं मी देवेंद्र फडणवीसांना फोनवर बोलल्याचा दावा देशमुखांनी पत्रकार परिषदेत केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAjit Pawarअजित पवार