शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:24 IST

Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. 

मुंबई - ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते. समित कदम हे फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरीही फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली असं सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांनी ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप आणण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला असा आरोप केला. अनिल देशमुख यांनी म्हटलं की, समित कदम इतका जवळचा माणूस आहे त्यामुळे सरकारने त्याला वाय सुरक्षा दिली. मिरज, सांगली भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध हे कुणीही सांगितले. माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.

तसेच जर मी त्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर आज उद्धव ठाकरे अतिशय अडचणीत असते. आदित्य ठाकरेला खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकलं असतं. लहान मुलांनाही घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा यांनी प्रयत्न केला. एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला, तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला असा दावाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. मी योग्य वेळी सर्व बाहेर काढेन, मी धमकीला घाबरत नाही. समित कदमला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी गृहमंत्री असताना रोज २०० लोक घरी भेटायला यायचे, मंत्रालयात अनेकजण भेटायचे. समित कदम हादेखील मला भेटला, त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडून आलोय असं सांगितले, त्यावेळी मी त्याला भेटलो तेव्हा हे सर्व सांगितले असंही अनिल देशमुखांनी म्हटलं.

ठाकरेंवर कोणते खोटे आरोप करायला सांगितले?

उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री म्हणून मला बोलावलं, त्यांनी महापालिकेसाठी आम्हाला पैशांची गरज आहे तुम्ही ३०० कोटी जमा करून द्या असं मला सांगितल्याचा खोटा आरोप मला करायचा होता. तर दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप लावणं याप्रकारचे खोटे प्रतिज्ञापत्र मला समित कदमने दिले. त्याच्या फोनवरून देवेंद्र फडणवीस माझ्यासोबत ५-६ वेळा बोलले. मात्र अनिल देशमुख असे खोटे आरोप कुणावर करणार नाही. तुम्ही ज्या खालच्या प्रकारचं राजकारण करताय हे महाराष्ट्रानं कधी पाहिलं नाही असं मी देवेंद्र फडणवीसांना फोनवर बोलल्याचा दावा देशमुखांनी पत्रकार परिषदेत केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAjit Pawarअजित पवार