शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

२०० टँकरद्वारे ३५ टंचाईग्रस्त गावांना पुरविले अडीच लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:48 AM

बार्शी तालुक्याला जैन समाजाची मदत; महावीर जयंतीनिमित्त राबविला उपक्रम

ठळक मुद्देकमी पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईबार्शी तालुक्यातील तहानलेल्या गावांना व गावकºयांना सकल जैन समाजाच्या वतीने पाण्याच्या माध्यमातून नवजीवनच मिळाले पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन उन्हाच्या तीव्रतेचा सामना करणाºया तालुक्यातील माता - भगिनींना मोफत पाणीपुरवठा सुरू

बार्शी  : बार्शीतील सकल जैन समाजाच्या वतीने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तहानलेल्या गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे मोफत पुरविण्यात येत असून, श्री भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून बार्शीतील श्री भगवान महावीर जन्मकल्याणक समितीच्या वतीने २५ एप्रिलपासून तालुक्यात आजअखेर २०० टँकरद्वारे ३५ गावांना २़५ लाख लिटर पिण्याचे पाणी मोफत पुरविण्यात आले आहे. 

यावर्षी कमी पावसामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, बार्शी तालुक्यातील तहानलेल्या गावांना व गावकºयांना सकल जैन समाजाच्या वतीने पाण्याच्या माध्यमातून नवजीवनच मिळाले आहे. पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन उन्हाच्या तीव्रतेचा सामना करणाºया तालुक्यातील माता - भगिनींना मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज सुमारे २० खेपा करून २़५ लाख लिटर पाणी ग्रामीण भागातील जनतेला देण्यात येत आहे. लोकवर्गणीतून देणगीदारांनी दिलेल्या आर्थिक मदतीसह शहरातील काही दानशूर व्यक्तींंनी आपल्या बोअरमधून मोफत पाणी या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यात बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, उद्योजक चंद्रकांत सोनिग्रा, शेतकरी नितीन ताटे व व्यापारी सतीश जाजू यांनी या उपक्रमाला पाणी उपलब्ध करून दिले आहे. 

हा उपक्रम यशस्वीतेसाठी समितीचे प्रदीप बागमार, अजित कुंकूलोळ, धन्यकुमार शहा, बाळासाहेब श्रीश्रीमाळ, गोविंद बाफणा, पवन श्रीश्रीमाळ, राजन कोठारी, भरत वखारिया, पारस कांकरिया व समिती सदस्य परिश्रम घेत आहेत़ 

या गावांना मिळाला लाभ- बार्शी तालुक्यातील सौंदरे, घाणेगाव, शेंद्री, तांदुळवाडी, बोरगाव झाडी, मांडेगाव, कदमवस्ती, कुसळंब, धानोरे, ढेंबरेवाडी,इर्ले, भोर्इंजे, सुर्डी, दडशिंगे, कांदलगाव, पिंपरी, नारेवाडी, हिंगणगाव, धसपिंपळगाव, कळंबवाडी, गोरमाळे, बोरगाव, भोयरे, फपाळवाडी, साकत, तावडी, खामगाव, नारी आदी गावांना मोफत पिण्याचे पाणी एक दिवसाआड टँकरद्वारे पुरविण्यात आले आहे. यापूर्वी २०१६ मध्येही सुमारे १६०० टँकरच्या खेपा करून बार्शी तालुक्यातील गावांना सकल जैन समाजाने महावीर जन्मकल्याण समितीच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा केला होता. दुष्काळी परिस्थितीत नेहमीच बार्शी ग्रामीण भागात सकल जैन समाजाने पिण्याचे पाणी पुरवले आहे.

टँकरसाठी मदतीचा ओघ..- सकल जैन समाज बार्शीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत पाणी टँकर योजनेसाठी मुंबई येथील सांताकू्रझ जैन ट्रस्टनेदेखील १२० टँकरसाठी निधी दिला आहे. पारगाव (बीड) चे अजित ताराचंदजी डुंगरवाल यांनी ५१ टँकरसाठी निधी दिला आहे. स्व.कमलबाई भंवरीलालजी फुलफगर परिवार ( घोडनदी) यांनी २१ टँकरसाठी निधी दिला आहे. तसेच बार्शीच्या सुभाषनगरस्थित हॅपी मॉर्निंग ग्रुपने २१ टँकरसाठी निधी दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीरdroughtदुष्काळTemperatureतापमानwater transportजलवाहतूक