शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

कोरोना काळात राज्यातील अपघातांत २४ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 9:38 AM

औरंगाबाद, पुण्यातील अपघाती मृत्युदरात मोठी घट.

ठळक मुद्देऔरंगाबाद, पुण्यातील अपघाती मृत्युदरात मोठी घट

अविनाश कोळी

सांगली : कोरोना काळात अनेक महिन्यांचा लॉकडाऊन व त्यामुळे घटलेली रस्त्यावरील वाहनांची संख्या अपघाताचा आलेख कमी करण्यास कारणीभूत ठरली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण तब्बल २४ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर राज्यात अपघाती मृत्युदराची सर्वाधिक घट पुणे, औरंगाबाद, सिंधूदुर्ग शहरात नोंदली गेली आहे.

राज्यातील अपघाताची संख्या व त्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे २०१८ ते २०२० या काळातील अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात घटत होते. कोरोना काळात मोठा लॉकडाऊन लागल्याने राज्यातील अपघातांच्या प्रमाणात अभूतपूर्व घट नोंदली गेली. 

चार जिल्ह्यात ३० टक्के अपघातपुणे, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या चार जिल्ह्यांतील अपघातांची संख्या राज्यातील एकूण अपघातात ३० टक्के इतकी आहे. दुसरीकडे २०२० मध्ये झालेल्या एकूण अपघाती मृत्यूमध्ये २६ टक्के म्हणजेच एकूण ३ हजार ३६ मृत्यू नाशिक ग्रामीण (८०१) , पुणे ग्रामीण (६९६), अहमदनगर (६४२), जळगाव (४७२), सोलापूर ग्रामीण (४२५) या भागात नोंदले गेले.

अनलॉक होताच पुन्हा वाढलॉकडाऊनमध्ये अपघातांच्या प्रमाणात मोठी घट झालेली असताना अनलॉक काळात मात्र अपघातांचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसत आहे. डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात राज्यात ३०७२ अपघात व १ हजार ४६२ मृत्यू नोंदले गेले. याउलट एप्रिल २०२० या महिन्यात सर्वांत कमी ५७२ अपघात व ३०३ मृत्यू नोंदले गेले आहेत.

                                २०१९      २०२०      घट %एकूण अपघात        ३२,९२५     २४,९७१     २४मृत्यू                        १२,७८८      ११,५६९    १०गंभीर अपघात         १२,१९७     ९,०९४      २५किरकोळ दुखापत    ५,४७३     ३,४३२      ३७

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या