शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सरकारी तिजोरीतून तीन तासांत काढले २ हजार कोटी

By admin | Updated: April 1, 2015 03:07 IST

भाजपा-शिवसेनेच्या सरकारने गतिमान कारभाराचा अनोखा नमुना दाखवित आज वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल पाच हजार ७५० कोटी रुपये सरकारी तिजोरीतून काढले

यदु जोशी, मुंबईभाजपा-शिवसेनेच्या सरकारने गतिमान कारभाराचा अनोखा नमुना दाखवित आज वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल पाच हजार ७५० कोटी रुपये सरकारी तिजोरीतून काढले. त्यातील २ हजार कोटी हे केवळ तीन तासांत निघाले. राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर (बिम्स) खर्चाचे आकडे आज शेवटच्या दिवशी हरणाच्या गतीने दौडत होते. सायंकाळी ५.३० पर्यंत ३६९९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ५.३० ते ८.३० या कालावधीत २ हजार ५१ कोटी रुपयांचे वितरण खर्चापोटी विविध विभागांना करण्यात आले. गर्दी मात्र ओसरलीआघाडी सरकारच्या काळात मंत्रालय ३१ मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरू असायचे. आमदार, नेते, अधिकारी, कंत्राटदारांची गर्दी असायची. पण या वेळी अर्थमंत्र्यांनी अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची शासकीय खरेदी १५ फेब्रुवारीपासून बंद केली होती. त्यामुळे खरेदीशी संबंधित लोकांची मंत्रालयात आज गर्दी नव्हती. रात्री ८.३० ला बिम्स प्रणाली बंद करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर रात्री उशिरापर्यंत होणारे ‘व्यवहार’ होऊ शकले नाहीत. अत्यावश्यक सोडून इतर योजना खर्चाला (प्लॅन्ड) २५ टक्के, तर योजनेतर खर्चाला (नॉनप्लॅन्ड) १५ टक्के कट लावण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला होता. आजच्या अखेरच्या दिवशी हा कट लावल्याचे स्पष्ट झाले. तरीही महिनाभरात शासनाने ३४ हजार ५१९ कोटी रुपये खर्च केला.