शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

बारावी उत्तीर्णांना १० सप्टेंबरपर्यंत प्रवेश

By admin | Published: August 30, 2016 6:08 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश द्यावेत, असे सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना राज्य शासनातर्फे नुकतेच कळविण्यात आले आहे. दहावी- बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलै- आॅगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेता येणार आहे. मात्र, बारावीचा निकाल जाहीर होऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही प्रवेशाबाबत शासनाकडून काहीच सांगितले जात नव्हते. शासनाकडून कोणताही लेखी पत्रव्यवहार न झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे विद्यापीठातील अधिकारी व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात होते. परंतु, राज्य शासनाचे उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना महाविद्यालयांच्या प्रवेशाची तारीख १० सप्टेंबरपर्यंत वाढवावी,असे पत्र पाठविले आहे. राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी याबाबत सांगितलेकी, बारावीच्या फेरपरीक्षेतउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी१० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात यावीतसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)