शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:12 IST

आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे.

ठाणे : राज्यात या वर्षात सुमारे ३३ हजार रस्ते अपघातांची नोंद झाली यात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे. यातील बळीची संख्या ७३० ने वाढली तरी जखमी संख्या मात्र घटली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात मुंबई शहरात झाले असले तरी कोल्हापुरात नोंदवल्या गेल्या अपघातात गतवर्षाच्या तुलनेत यंदा मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १६५ ने अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे.राज्यातील अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने रस्ते आणि अपघातांसंदर्भात असलेल्या सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार सर्वच यंत्रणा ते रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. तसेच सूचना आणि सुधारणांसंदर्भात आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात राज्यातील ३४ जिल्हे आणि ९ शहरे अशी ४३ ठिकाणी एकूण ३२ हजार ८५२ अपघात झाले आहेत. यामध्ये ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला असून २९ हजार १४ जण जखमी झाले आहे. तर गतवर्षी या अकरा महिन्यात ३२ हजार ४८३ अपघातांची नोंद झाली होती. त्यावेळी ११ हजार ०६६ जणांचा मृत्यू तर २९ हजार १२६ जण जखमी झाले होते. तुलना करायची झाली तर यंदा अपघातांची संख्या १.१ टक्क्यांनी वाढली असून या अपघात दगावणाºयांची संख्या ६.६ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र,जायबंदी होण्याचे प्रमाण वजा ०.४ इतक्यांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात अपघात वाढलेगतवर्षी ठाणे जिल्ह्यात ७८६ अपघातांची नोंद होती. त्यामध्ये २१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ५४२ जायबंदी झाले होते. यावर्षात ८२१ अपघात झाले असून त्यामध्ये २६६ जणांचा मृत्यू तर ५९४ जण जखमी झाले आहेत. शहरात गतवर्षी ८८९ अपघातात २०१ जणांना मृत्यू झाला तर ८९१ जण जखमी झाले होते. यावर्षात ८९१ अपघातांच्या नोंदीत २२९ जण दगावले असून ९१८ जण जायबंदी झाले आहेत.कुठे गेले जास्त बळीटक्केवारीनुसार गतवर्षाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त १४८ बळी या वर्षात कोल्हापुरात गेले आहेत. त्यापाठोपाठ सातारा ६९, सिंधूदुर्ग-४०,नंदुरबार-२९, उस्मानाबाद-२५,सोलापूर- २४,ठाणे-२३,रायगड-२२ अशाप्रकारे संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.जखमींमध्ये ठाणे ६ नंबरवरटक्केवारीनुसार अपघातील बळींपाठोपाठ ७४ टक्क्यांनी जखमींची संख्या कोल्हापुरात अधिक असल्याचे दिसते. त्या पाठोपाठ,सोलापूर २७, बुलडाणा-२६, रायगड-२३, अहमदनगर १६ आणि ठाणे आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी दहा इतक्या टक्के इतकी जखमींची संख्या आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र