शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:12 IST

आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे.

ठाणे : राज्यात या वर्षात सुमारे ३३ हजार रस्ते अपघातांची नोंद झाली यात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे. यातील बळीची संख्या ७३० ने वाढली तरी जखमी संख्या मात्र घटली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात मुंबई शहरात झाले असले तरी कोल्हापुरात नोंदवल्या गेल्या अपघातात गतवर्षाच्या तुलनेत यंदा मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १६५ ने अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे.राज्यातील अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने रस्ते आणि अपघातांसंदर्भात असलेल्या सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार सर्वच यंत्रणा ते रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. तसेच सूचना आणि सुधारणांसंदर्भात आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात राज्यातील ३४ जिल्हे आणि ९ शहरे अशी ४३ ठिकाणी एकूण ३२ हजार ८५२ अपघात झाले आहेत. यामध्ये ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला असून २९ हजार १४ जण जखमी झाले आहे. तर गतवर्षी या अकरा महिन्यात ३२ हजार ४८३ अपघातांची नोंद झाली होती. त्यावेळी ११ हजार ०६६ जणांचा मृत्यू तर २९ हजार १२६ जण जखमी झाले होते. तुलना करायची झाली तर यंदा अपघातांची संख्या १.१ टक्क्यांनी वाढली असून या अपघात दगावणाºयांची संख्या ६.६ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र,जायबंदी होण्याचे प्रमाण वजा ०.४ इतक्यांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात अपघात वाढलेगतवर्षी ठाणे जिल्ह्यात ७८६ अपघातांची नोंद होती. त्यामध्ये २१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ५४२ जायबंदी झाले होते. यावर्षात ८२१ अपघात झाले असून त्यामध्ये २६६ जणांचा मृत्यू तर ५९४ जण जखमी झाले आहेत. शहरात गतवर्षी ८८९ अपघातात २०१ जणांना मृत्यू झाला तर ८९१ जण जखमी झाले होते. यावर्षात ८९१ अपघातांच्या नोंदीत २२९ जण दगावले असून ९१८ जण जायबंदी झाले आहेत.कुठे गेले जास्त बळीटक्केवारीनुसार गतवर्षाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त १४८ बळी या वर्षात कोल्हापुरात गेले आहेत. त्यापाठोपाठ सातारा ६९, सिंधूदुर्ग-४०,नंदुरबार-२९, उस्मानाबाद-२५,सोलापूर- २४,ठाणे-२३,रायगड-२२ अशाप्रकारे संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.जखमींमध्ये ठाणे ६ नंबरवरटक्केवारीनुसार अपघातील बळींपाठोपाठ ७४ टक्क्यांनी जखमींची संख्या कोल्हापुरात अधिक असल्याचे दिसते. त्या पाठोपाठ,सोलापूर २७, बुलडाणा-२६, रायगड-२३, अहमदनगर १६ आणि ठाणे आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी दहा इतक्या टक्के इतकी जखमींची संख्या आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र