शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

राज्यात ३३ हजार अपघातात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू, सर्वाधिक मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:12 IST

आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे.

ठाणे : राज्यात या वर्षात सुमारे ३३ हजार रस्ते अपघातांची नोंद झाली यात ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत यंदा १.१ टक्क्यांनी वाढली आहे. यातील बळीची संख्या ७३० ने वाढली तरी जखमी संख्या मात्र घटली आहे. यामध्ये सर्वाधिक अपघात मुंबई शहरात झाले असले तरी कोल्हापुरात नोंदवल्या गेल्या अपघातात गतवर्षाच्या तुलनेत यंदा मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १६५ ने अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे.राज्यातील अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने रस्ते आणि अपघातांसंदर्भात असलेल्या सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार सर्वच यंत्रणा ते रोखण्यासाठी कामाला लागल्या आहेत. तसेच सूचना आणि सुधारणांसंदर्भात आढावा घेण्याचे काम सुरू आहे. या वर्षातील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात राज्यातील ३४ जिल्हे आणि ९ शहरे अशी ४३ ठिकाणी एकूण ३२ हजार ८५२ अपघात झाले आहेत. यामध्ये ११ हजार ७९६ जणांचा मृत्यू झाला असून २९ हजार १४ जण जखमी झाले आहे. तर गतवर्षी या अकरा महिन्यात ३२ हजार ४८३ अपघातांची नोंद झाली होती. त्यावेळी ११ हजार ०६६ जणांचा मृत्यू तर २९ हजार १२६ जण जखमी झाले होते. तुलना करायची झाली तर यंदा अपघातांची संख्या १.१ टक्क्यांनी वाढली असून या अपघात दगावणाºयांची संख्या ६.६ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र,जायबंदी होण्याचे प्रमाण वजा ०.४ इतक्यांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात अपघात वाढलेगतवर्षी ठाणे जिल्ह्यात ७८६ अपघातांची नोंद होती. त्यामध्ये २१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ५४२ जायबंदी झाले होते. यावर्षात ८२१ अपघात झाले असून त्यामध्ये २६६ जणांचा मृत्यू तर ५९४ जण जखमी झाले आहेत. शहरात गतवर्षी ८८९ अपघातात २०१ जणांना मृत्यू झाला तर ८९१ जण जखमी झाले होते. यावर्षात ८९१ अपघातांच्या नोंदीत २२९ जण दगावले असून ९१८ जण जायबंदी झाले आहेत.कुठे गेले जास्त बळीटक्केवारीनुसार गतवर्षाच्या तुलनेत यंदा सर्वात जास्त १४८ बळी या वर्षात कोल्हापुरात गेले आहेत. त्यापाठोपाठ सातारा ६९, सिंधूदुर्ग-४०,नंदुरबार-२९, उस्मानाबाद-२५,सोलापूर- २४,ठाणे-२३,रायगड-२२ अशाप्रकारे संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.जखमींमध्ये ठाणे ६ नंबरवरटक्केवारीनुसार अपघातील बळींपाठोपाठ ७४ टक्क्यांनी जखमींची संख्या कोल्हापुरात अधिक असल्याचे दिसते. त्या पाठोपाठ,सोलापूर २७, बुलडाणा-२६, रायगड-२३, अहमदनगर १६ आणि ठाणे आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी दहा इतक्या टक्के इतकी जखमींची संख्या आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र