शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची २९ तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 06:53 IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. 

मुंबई : इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान घेण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत जाहीर केले.दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. कोरोनाबाबत राज्य तसेच केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आधीच घेतला आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग ५० टक्के उपस्थितीत सुरू आहेत आणि त्या ५० टक्के संख्येच्या ७६ टक्के विद्यार्थी उपस्थित असतात, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.कोरोना काळात शाळांनी शुल्क आकारण्याच्या मुद्यावर अनेक पालकांनी आक्षेप घेतले आहेत. राज्य शासन पालकांसोबतच आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. लॉकडाउन काळात नोकऱ्या गेल्या. पगार कमी झाले, याची पूर्ण जाणीव शासनाला आहे. शासन आपली बाजू न्यायालयात मांडेल. दरम्यानच्या काळात शाळा अन्यायकारक वागत असतील, असा पालकांचा आक्षेप असेल तर त्यांनी शिक्षण विभागाशी, उपसंचालकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले.इयत्ता बारावीची सराव परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान तर इयत्ता दहावीची सराव परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान होईल.

काेराेना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा - दहावी-बाराीच्या परीक्षांच्या काळात एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्याचे सत्र वाया जाणार नाही. त्याची फेरपरीक्षा घेतली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :examपरीक्षाVarsha Gaikwadवर्षा गायकवाडStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षक