शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

देशातील १०० टक्के वाहने बॅटरी संचलित करणार : चंद्रशेखर बावनकुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 14:21 IST

इंधनाचे साठे मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे पर्यायांचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन एकदा बॅटरी चार्ज केली की वाहन किमान ४०० किलोमीटर गेले पाहिजे अशी क्षमता विद्यूत शक्तीवरील वाहनांचीही निर्मिती

पुणे: देशातील १०० टक्के चार चाकी वाहने विद्यूत शक्तीवर चालणारी अशी करायची आहेत. एकदा बॅटरी चार्ज केली की वाहन किमान ४०० किलोमीटर गेले पाहिजे अशी क्षमता तयार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील प्रवास अत्यंत स्वस्त होईल, असे ऊर्जामंत्री चंद्रेशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यासाठी देशभर चार्जिंग स्टेशन्सही तयार करण्यात येतील असे ते म्हणाले.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी व बाणेर येथील युथिका सोसायटी यांच्या वतीने सोसायटीमध्ये स्मार्ट सोलर प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, आमदार मेधा कुलकर्णी, औंध बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अनिल किल्लोर, युथिका सोसायटीचे अध्यक्ष सुनित जोशी यावेळी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, इंधनाचे साठे आता मर्यादित स्वरूपात आहेत. त्यामुळे पर्यायांचा शोध घेतला जात आहे. राज्यात तसेच देशातही सर्वत्र ३६५ दिवसांपैकी ३२८ दिवस चांगला सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा वापर करून सौर उर्जा तयार करण्यात येत आहे. त्याचा खर्चही आता कमी झाला आहे. त्याशिवाय विद्यूत शक्तीवरील वाहनेही तयार होत आहे. भविष्यात त्याचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.जगताप यांनी स्मार्ट प्रकल्पाची माहिती दिली. स्मार्ट सिटीमध्ये १० टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्त्रोतापासून तयार करणे अपेक्षित आहे. ते काम आता सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तीन कंपन्यांबरोबर सामंजस्य करारही करण्यात आला आहे. बालवडकर यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नागरिकांचा सकारात्मक सहभाग मिळेल अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Puneपुणेfour wheelerफोर व्हीलरElectric Carइलेक्ट्रिक कारMaharashtraमहाराष्ट्र