शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 17:36 IST

Madhya Pradesh CM Mohan Yadav News: हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विरोधकांना लगावला.

Madhya Pradesh CM Mohan Yadav News ( Marathi News ): आमच्यासाठी भाजपाचे संकल्पपत्र हे भगवद्गीता आणि रामायणाच्या पवित्र ग्रंथासारखे आहे. हे संकल्पपत्र आमच्या सरकारचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा ठरवेल. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी काम करणे हे राज्य सरकारचे काम आहे. त्यासोबतच राज्याचा व देशाचा लौकिक वाढविण्यावरही भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले आहे. विधानसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपाने एका चहा विक्रेत्याला पंतप्रधान आणि मजूर कुटुंबातील मुलाला मुख्यमंत्री केले. हे फक्त भाजपाच करू शकते. काँग्रेसमध्ये अशा गोष्टींचा अभाव आहे. हे लोक लंडनला जाऊन कपडे खरेदी करतात, त्यांना काय समजणार? असा खोचक सवाल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलावे, अशी मागणी विरोधकांनी केली. 

भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल

भाजपमध्ये पुढच्या पिढीची काळजी घेतली जाते. पण काँग्रेस पक्षाला यासाठी मोठा धक्का बसावा लागतो. काँग्रेसचा अहवाल खराब आहे. अरुण यादव यांनी खूप काम केले, पण काँग्रेस पक्षाने कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांना पुढे केले. भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल, असा टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लगावला.

आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते

मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, भाजपाचे संकल्पपत्र हे पवित्र ग्रंथासारखे आहे. आमच्यासाठी ते गीता आणि रामायणासारखे आहे. हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे. आम्ही तुमच्याशी पाच वर्षांनी संकल्पपत्राबाबत बोलू. आमचे सरकार आल्यापासून आम्ही अनेक अजेंडे पुढे नेत आहोत. आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते, असे मोहन यादव यांनी नमूद केले.

दरम्यान, काही लोक दिवसाची सुरुवात सूर्योदयाने करतात तर काही सूर्यास्तानंतर. पण, रात्री बारा वाजल्यापासून दिवस बदलण्याची ही कसली सुरुवात, असे मुख्यमंत्री यादव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री यादव यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, हे खूप चांगले आहे, आजपासून राज्याचा वेळ का बदलत नाही, असा खोचक सवाल काँग्रेस नेते जयवर्धन सिंह यांनी केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा