शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

“पक्षाचे संकल्पपत्र आमच्यासाठी गीता, रामायणासारखे पवित्र”; CM मोहन यादव स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 17:36 IST

Madhya Pradesh CM Mohan Yadav News: हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विरोधकांना लगावला.

Madhya Pradesh CM Mohan Yadav News ( Marathi News ): आमच्यासाठी भाजपाचे संकल्पपत्र हे भगवद्गीता आणि रामायणाच्या पवित्र ग्रंथासारखे आहे. हे संकल्पपत्र आमच्या सरकारचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा ठरवेल. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी काम करणे हे राज्य सरकारचे काम आहे. त्यासोबतच राज्याचा व देशाचा लौकिक वाढविण्यावरही भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले आहे. विधानसभेला संबोधित करताना ते बोलत होते. 

भाजपाने एका चहा विक्रेत्याला पंतप्रधान आणि मजूर कुटुंबातील मुलाला मुख्यमंत्री केले. हे फक्त भाजपाच करू शकते. काँग्रेसमध्ये अशा गोष्टींचा अभाव आहे. हे लोक लंडनला जाऊन कपडे खरेदी करतात, त्यांना काय समजणार? असा खोचक सवाल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलावे, अशी मागणी विरोधकांनी केली. 

भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल

भाजपमध्ये पुढच्या पिढीची काळजी घेतली जाते. पण काँग्रेस पक्षाला यासाठी मोठा धक्का बसावा लागतो. काँग्रेसचा अहवाल खराब आहे. अरुण यादव यांनी खूप काम केले, पण काँग्रेस पक्षाने कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांना पुढे केले. भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल, असा टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लगावला.

आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते

मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, भाजपाचे संकल्पपत्र हे पवित्र ग्रंथासारखे आहे. आमच्यासाठी ते गीता आणि रामायणासारखे आहे. हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे. आम्ही तुमच्याशी पाच वर्षांनी संकल्पपत्राबाबत बोलू. आमचे सरकार आल्यापासून आम्ही अनेक अजेंडे पुढे नेत आहोत. आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते, असे मोहन यादव यांनी नमूद केले.

दरम्यान, काही लोक दिवसाची सुरुवात सूर्योदयाने करतात तर काही सूर्यास्तानंतर. पण, रात्री बारा वाजल्यापासून दिवस बदलण्याची ही कसली सुरुवात, असे मुख्यमंत्री यादव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री यादव यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, हे खूप चांगले आहे, आजपासून राज्याचा वेळ का बदलत नाही, असा खोचक सवाल काँग्रेस नेते जयवर्धन सिंह यांनी केला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा