शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण तिपटीने जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे ठरत आहे. महिलांनी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले ...

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे ठरत आहे. महिलांनी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा ॲनिमियासारखा आजार होऊन अन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहारात लोहाची कमतरता झाली की ॲनिमिया होतो. ॲनिमियामध्ये रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील अवयवांवर परिणाम होतो.

सर्वसाधारणपणे पुरुषांत १३-१६ ग्रॅम टक्के, महिलांमध्ये १२ ते १५ ग्रॅम टक्के, गरोदर मातांमध्ये ११ ग्रॅम टक्के रक्त असावे लागते. ॲनिमिया हा किशोरवयीन मुलींत जवळपास ७० टक्के, मुलांत ५४ टक्के, तर ४९ वर्षांतील महिलांमध्ये ५० टक्के आहे. पुरुषांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण १५ टक्के असून त्याच्या तिप्पट महिलांमध्ये आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ॲनिमियाला सायलेंट इमर्जन्सी असे म्हटले आहे. लोहाची कमतरता, बी १२, फोलिक ॲसिडमुळे हा आजार होतो.

महिलांमध्ये हा आजार अति रक्तस्राव, बालकांत जंतांचे आजार, लाल पेशींचे काही अनुवंशिक आजार, प्रसूतीपश्चात रक्तस्राव, काही दीर्घकालीन आजार, मुलींचा विवाह लवकर होऊन त्या गरोदर राहणे, दोन मुलांमधील अंतर कमी असणे, अशा बाबी या आजारास कारणीभूत ठरतात.

या आजाराची मासिक पाळीवेळी थकवा जाणवणे, रक्ताच्या कमतरतेमुळे धडधड होणे, गळून गेल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा, नखे ठिसूळ होणे, केस पांढरे होणे, जास्त वेळ एकाग्रतेत काम न करता येणे, पायाला अथवा सर्वांगाला सूज येणे अशी लक्षणे आहेत.

वेळेत निदान न केल्यास महिलेची कार्यक्षमता अगदी कमी होते, रोग प्रतिकारशक्ती कमी होते, हृदय व फुप्फुसावर अतिरिक्त ताण पडून ते निकामी होण्याचा धोका असतो. गर्भवती महिलांमध्ये बाळाची वाढ पूर्ण न होणे, परिणामी कमी वजनाचे बाळ जन्मणे, बाळंतपणात गुंतागुंत असे या आजाराचे परिणाम होतात.

लोहयुक्त आणि संतुलित आहारामुळे हा आजार टाळता येऊ शकतो. चणे, पालक, ब्रोकोली, भोपळा बिया, सूर्यफूल बिया, काजू, पिस्ता, गूळ, बदाम खाण्यामुळे ॲनिमिया टाळता येऊ शकतो. तसेच भाज्या लोखंडाच्या भांड्यात शिजवाव्यात, महिलांनी वर्षातून एकदा तरी हिमोग्लोबीन तपासणी करावी, असा सल्लाही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सहयोगी प्रा. डॉ. विमल होळंबे-डोळे यांनी दिला.