शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

अवकाळीच्या पंचनाम्याला गती मिळेना; लातूर जिल्ह्यात चार दिवसांत केवळ ३७ टक्के काम!

By संदीप शिंदे | Updated: March 23, 2023 19:09 IST

अवकाळी पाऊस, गारपीटीने लातूर जिल्ह्यात ११ हजार ८९१ हेक्टरवर नुकसान झाले आहे

लातूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास ११ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी केवळ ३७.४९ टक्के क्षेत्रावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला गती मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, द्राक्षे, टरबूल, आंबा, खरबूज, पपईसह भाजीपाल्याचे जवळपास ११ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या १८ हजार १४८ आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत केवळ ४ हजार ४५७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ३७.४९ टक्के आहे. तर पंचनामे पुर्ण झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार २१५ आहे. दरम्यान, दोन दिवसांत पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी केवळ ३७ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.

६३ टक्के क्षेत्रावरील पंचनामे कधी होणार...गेल्या चार दिवसांत ३७.४९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. यात लातूर तालुक्यात २७ टक्के, रेणापूर २३, निलंगा ४५, शिरुर अनंतपाळ २३, देवणी ५९, उदगीर ४०, जळकोट ०७, अहमदपूर १५ तर चाकूर तालुक्यात १९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे करण्यात आले. त्यामुळे उर्वरित ६३ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

१८ हजार १४८ बाधित शेतकरी संख्या...अवकाळी पाऊस व गारपीटीने जिल्ह्यातील १८ हजार १४८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नूकसान झाले. यात सर्वाधिक निलंगा तालुक्यातील ५ हजार ७५० शेतकरी आहेत. त्या खालोखाल रेणापूर तालुक्यातील ४२४५, देवणी ३४५८, लातूर १२००, शिरुर अनंतपाळ १३३४, उदगीर ४७४, जळकोट ७३६, अहमदपूर २७८ तर चाकूर तालुक्यातील ६७३ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान...जिल्ह्यात जिरायती क्षेत्रावरील ९५८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर १७३५ हेक्टरवरील बागायती व ५७० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत ३७६२ जिरायती, ४४१ बागायती तर २५३ हेक्टरवरील फळपिकांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. अद्यापही १० हजार ९३३ शेतकऱ्यांचे ७ हजार ४३४ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद