शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

अवकाळीच्या पंचनाम्याला गती मिळेना; लातूर जिल्ह्यात चार दिवसांत केवळ ३७ टक्के काम!

By संदीप शिंदे | Updated: March 23, 2023 19:09 IST

अवकाळी पाऊस, गारपीटीने लातूर जिल्ह्यात ११ हजार ८९१ हेक्टरवर नुकसान झाले आहे

लातूर : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास ११ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. दोन दिवसांत पंचनामे पुर्ण करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी केवळ ३७.४९ टक्के क्षेत्रावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्यामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला गती मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, द्राक्षे, टरबूल, आंबा, खरबूज, पपईसह भाजीपाल्याचे जवळपास ११ हजार ८९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या १८ हजार १४८ आहे. दरम्यान, गुरुवारपर्यंत केवळ ४ हजार ४५७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. याची टक्केवारी ३७.४९ टक्के आहे. तर पंचनामे पुर्ण झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या ७ हजार २१५ आहे. दरम्यान, दोन दिवसांत पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी केवळ ३७ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.

६३ टक्के क्षेत्रावरील पंचनामे कधी होणार...गेल्या चार दिवसांत ३७.४९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. यात लातूर तालुक्यात २७ टक्के, रेणापूर २३, निलंगा ४५, शिरुर अनंतपाळ २३, देवणी ५९, उदगीर ४०, जळकोट ०७, अहमदपूर १५ तर चाकूर तालुक्यात १९ टक्के क्षेत्रावरील पंचनामे करण्यात आले. त्यामुळे उर्वरित ६३ टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

१८ हजार १४८ बाधित शेतकरी संख्या...अवकाळी पाऊस व गारपीटीने जिल्ह्यातील १८ हजार १४८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नूकसान झाले. यात सर्वाधिक निलंगा तालुक्यातील ५ हजार ७५० शेतकरी आहेत. त्या खालोखाल रेणापूर तालुक्यातील ४२४५, देवणी ३४५८, लातूर १२००, शिरुर अनंतपाळ १३३४, उदगीर ४७४, जळकोट ७३६, अहमदपूर २७८ तर चाकूर तालुक्यातील ६७३ शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिरायती शेतीचे सर्वाधिक नुकसान...जिल्ह्यात जिरायती क्षेत्रावरील ९५८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर १७३५ हेक्टरवरील बागायती व ५७० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत ३७६२ जिरायती, ४४१ बागायती तर २५३ हेक्टरवरील फळपिकांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. अद्यापही १० हजार ९३३ शेतकऱ्यांचे ७ हजार ४३४ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद