शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

आंबट चिंचेची गोड कहाणी, बाजारात आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:18 AM

ग्रामीण भागातील शेतीच्या बांधावर आंबा, चिंच झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते. चिंचेचे झाड वाढण्यासाठी त्याला पाणी कमी लागते ...

ग्रामीण भागातील शेतीच्या बांधावर आंबा, चिंच झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते. चिंचेचे झाड वाढण्यासाठी त्याला पाणी कमी लागते तर झाडाची मुळे खोलवर जातात. उन्हाळ्यात हे झाड हिरवे असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांना, जनावरांना थांबण्यासाठी झाडाच्या सावलीचा फायदा होतो. परिणामी, शेतात, गावाच्या भोवताली चिंचेची झाडे फार पूर्वीपासून आढळून येतात. चिंचेपासून अनेक खाद्यपदार्थ, औषधी पदार्थ तर चिंचेच्या आत असणाऱ्या चिंचोक्यापासून विविध पदार्थ बनविले जातात. स्वयंपाकघरात महिला अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी वापर करतात. शासनानेही या बहुआयामी झाडाची लागवड वाढावी म्हणून १९९५ पासून १०० टक्के अनुदान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी चिंचेची लागवड करण्यात रस दाखवत आहेत.

मागील वर्षी अवकाळी पावसामुळे चिंचेला फुलोरा कमी प्रमाणात आल्याने फळधारणा कमी झाली होती. त्यामुळे, उत्पादनात घट झाल्याने बाजारात चिंचेला १२ ते २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला हाेता. मात्र, यंदा जून महिन्यापासून पावसाने सातत्य ठेवल्याने चिंचेच्या झाडाला मोहर चांगला लागला होता. यातून यंदा चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. ग्रामीण भागात २० वर्षांपूर्वी गावरान चिंचेची लागवड शेतीच्या बांधावर आणि सावलीसाठी केली जात होती. आता बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे चिंचेचे वेगवेगळे वाण उपलब्ध झाले आहेत. मागणीबरोबर उत्पादनही वाढले आहे. त्यामुळे शेतकरी फळबाग म्हणून चिंचेच्या लागवडीकडे वळला आहे. यातून ग्रामीण भागात उन्हाळ्यात घरी बसून महिलांना चिंच फोडण्यापासून ते चिंच बाजारात येईपर्यंत अनेकांच्या हाताला राेजगार मिळत असल्याने शेतकरीही याकडे चांगले उत्पादन हाेणारे फळ म्हणून पाहत आहेत. यंदा निसर्गाने साथ दिल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शनिवारी उदगीरच्या बाजारात ७ हजारांपासून १५ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल चिंचेला दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. सध्या ४०० ते ६०० क्विंटलची आवक झाली आहे.

आवक वाढल्यास दरात हाेईल घसरण...

उदगीरच्या बाजारातून आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चिंच जात आहे. मागील वर्षी लॉकडाऊन आणि उत्पादन घटल्याने प्रतिक्विंटलला १२ ते २० हजार रुपयांचा दर हाेता. मात्र, यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने ७ ते १२ हजारांचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आगामी काळात आवक वाढल्यास दरात आणखी घसरण होण्याची शक्यता असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- नरसिंग रामासाने, चिंचेचे व्यापारी, उदगीर