शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

ती येते अन् काही क्षणात गुल होते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे सातत्याने विजेचा लपंडाव होत आहे. त्यामुळे वीज कधी येईल आणि कधी ...

हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे सातत्याने विजेचा लपंडाव होत आहे. त्यामुळे वीज कधी येईल आणि कधी जाईल, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. परिणामी, गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. ती येते अन् क्षणात गुल होते, असे म्हणण्याची वेळ गावातील ग्राहकांवर आली आहे.

उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी हे बाजारपेठेचे गाव आहे. गावात विद्युत ग्राहकांची संख्याही मोठी आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गावात डीपी आहे. परंतु, डीपीवर जास्त भार वाढल्याने सतत बिघाड होत आहे. परिणामी, विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गावातील बहुतांश ग्राहक नियमितपणे वीजबिलाचा भरणा करतात. परंतु, काहीजण अनधिकृतरीत्या वीज वापरत असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, डीपीवर अतिरिक्त भार वाढत आहे. हाळी गावातील घोगरे डीपी, ढोर गल्लीतील डीपी, बसस्थानक परिसर, हंडरगुळी गावातील जनावरांचा बाजार, पाण्याची टाकी आदी भागातील डीपी नेहमी उघड्याच असतात. या सर्व डीपीवर वाढलेल्या भारामुळे नेहमी वीज गुल होत आहे.

तसेच कमी- जास्त विद्युत पुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून नुकसान होत आहे.

सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा परिणाम विद्युत यंत्रणेवर आधारित असलेल्या छोट्या- मोठ्या व्यवसायावर होत आहे. वीज कधी येईल, आणि कधी जाईल हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे, दररोज सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत भारनियमन आहे. याशिवाय, सातत्याने वीज गुल होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी परमेश्वर माने, संतोष माने, विजय जोगदंड, आदर्श माने, गौसुद्दीन शेख यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

लाईनमनची धावपळ...

गावातील वीजपुरवठा खंडित झाला की लाईनमनची धावपळ सुरू होते. काही वेळानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जातो. परंतु, तो काही वेळच असतो. पुन्हा वीज गुल होते. वीजपुरवठा सातत्याने कशामुळे खंडित होत आहे, हे अद्यापही समजले नाही. त्यामुळे गावातील नागरिक वैतागले आहेत.