शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बांधकामे व आस्थापनांना मलनिस्सारण प्रकल्प अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

विविध विकासकामांमुळे बांधकाम क्षेत्र वाढत असून, त्यात नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. कचरा व्यवस्थापन, ...

विविध विकासकामांमुळे बांधकाम क्षेत्र वाढत असून, त्यात नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर व हरितगृह वायू उत्सर्जनात संतुलन साधण्यासाठी पर्यावरण पूरक इमारत बांधकाम क्षेत्रासाठी राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या तत्त्वांच्या अंमलबजावणीमुळे ऊर्जा वापरात २० ते ३० टक्के तर पाणी वापरामध्ये १५ ते २० टक्के बचत होणे अपेक्षित आहे. यासोबतच कचऱ्याचे प्रमाणही कमी होणार आहे. राज्य शासन व हरित लवादाच्या आदेशानुसार यापुढे १० खाटांच्या वरील दवाखाने, १०० चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असणारी मंगल कार्यालये, २५ पेक्षा अधिक बेड असणारे हॉटेल व लॉजिंग, गोशाळा, शाळा व महाविद्यालये, ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी असणारे कोचिंग क्लासेस, तीनशेहून अधिक आसन क्षमता असणारे चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, अपार्टमेंट यांना आता मलनिस्सारण प्रकल्प बंधनकारक करण्यात आला आहे. नव्याने बांधकाम होत असेल किंवा यापूर्वी अशा संस्था किंवा आस्थापना कार्यरत असतील या दोघांसाठीही मलनिस्सारण प्रकल्प अनिवार्य आहे. अशा संस्थांनी लवकरात लवकर त्याचे बांधकाम करून घ्यायचे आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन २५ ऑगस्टपर्यंत ते महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी दिले आहेत.