शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीवर निर्बंध; विश्व हिंदू परिषद करणार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी निजाम राजवटीतही वारी सुरूच होती. वारीला ...

आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी निजाम राजवटीतही वारी सुरूच होती. वारीला कोणतीही आडकाठी नव्हती. सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत. हा निर्णय चुकीचा आहे. सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. देशपांडे म्हणाले, कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत आम्ही पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती. वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी. गरज असेल तर केंद्रीय पोलीस बल मागवावे. दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी. मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करीत वारीला आम्ही परवानगी मागितली होती; पण सरकार तयार झाले नाही.

संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्याही पंढरपुरात येत असतात. या दिंड्यांसह किमान दोन वारकऱ्यांना जाण्यास परवानगी द्यावी. प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या वारकऱ्यानांच सहभागी होऊ द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भजन आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही सरकारने परवानगी दिलीच नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक गावात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गाव हेच पंढरपूर आणि झाड हाच पांडुरंग असे समजून झाडाच्या स्वरूपातील विठ्ठलाची पूजा प्रत्येक गावातील वारकरी करतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष बालाजीराव गवळी, हभप भरत भिंगोलीकर महाराज, हभप बाबू महाराज शिवलकर, वासुदेवाचार्य कमठाणकर, गौरीशंकर कौळखेरे यांची उपस्थिती होती.